मुंबईला भूस्खलनाचा वाढता धोका?

विक्रोळी, भांडुप, पवईतील नागरिकांसाठी इशारा


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एस विभागातील विक्रोळी, भांडुप आणि पवई येथील उंच उतार आणि सैल माती असलेल्या भागाला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी विभागाने भूस्खलनाचा इशारा दिला आहे. या विभागात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडतो. तसेच हे क्षेत्र भूकंपीय क्षेत्र ३ (मध्यम भूकंप प्रवण प्रदेश) अंतर्गत येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या एस विभागात भूस्खलनामुळे होणारी घटना टाळण्यासाठी किंवा जीवितहानी रोखण्यासाठी म्हाडाने भारताचे भूगर्भीय सर्वेक्षणामार्फत नोदविलेल्या १३ संवेदनशील ठिकाणी संरक्षक भिंती बांधल्या आहेत.


तसेच एस विभागातील सूर्यनगर, विक्रोळी (प.), इंदिरा नागा, पवई, हनुमान नगर, भांडुप (प.), नादर चाळ, भांडुप (प.), खिंडीपाडा, भांडुप (प.), तुलशेतपाडा, भांडुप (प.), खिंडीपाडा, भांडुप (प.), या ७ठिकाणी भूस्खलन टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत तसेच मुंबई महापालिकेच्या एस विभागाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी किंवा महापालिकेच्या तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. यासाठी पालिकेच्यावतीने विक्रोळी (प.) आणि भांडुप (प.) या डोंगराळ झोपडपट्टी भागात माहितीपूर्ण बॅनर आणि फ्लेक्स नागरिकांच्या माहितीसाठी लावले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी विक्रोळी येथील सूर्यानगर या दरड प्रवण क्षेत्राला भेट देऊन येथे संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश दिले होते. दरवर्षी याठिकाणी दुर्घटना घडत असल्याने स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, असे संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते. शिंदे यांनी भांडुप येथील उषानगर, उषा कॉम्प्लेक्स, नेहरूनगर नाला वडाळा, दादर येथील नालेसफाईची पाहणी केली.



'एस' विभागाने तात्पुरत्या निवारागृहांची सोय केलेली ठिकाणे


टेंभीपाडा महानगरपालिका शाळा, भांडुप (प.)
तिरंदाज मराठी प्राथमिक शाळा, पवई
पासपोली मराठी प्राथमिक शाळा, पवई
भांडुप महानगरपालिका शाळा, भांडुप
कन्नमवार नगर महानगरपालिका शाळा, विक्रोळी (प.)
टागोर नगर महानगरपालिका शाळा, विक्रोळी (प.)
एमव्हीआर शिंदे मार्ग पालिका शाळा, भांडुप (प.)
वर्षा नगर एमपीएस शाळा, विक्रोळी (प.)
नेहरू नगर एमपीएस शाळा, कांजूरमार्ग (प.)
तुलशेत पाडा महानगरपालिका शाळा, भांडुप (प.)

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात