अहमदाबाद ते मुंबई दरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावणार

५०८ किमीच्या या अंतरासाठी हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरची निर्मिती


मुंबई :गुजरातमधील अहमदाबाद ते महाराष्ट्रातील मुंबई या दरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. ५०८ किलोमीटरच्या या अंतरासाठी हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरची निर्मिती करण्यात येत आहे. याविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. एका वृत्तानुसार, २०२८ पर्यंत गुजरातमधील साबरमती ते वापी यादरम्यान काम पूर्ण होईल. तर २०३० पर्यंत या मार्गावरून बुलेट ट्रेन धावेल. त्यामुळे बुलेट ट्रेनचे स्वप्न अजून पाच वर्षे दूर असल्याचे समोर येत आहे.


नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) रायडरशिप सर्वे केला आहे. त्यामध्ये प्रवाशी संख्या, भाडे किती असावे, ट्रॅफिक किती असेल याचा अंदाज घेण्यात आला आहे. सध्या कार, टॅक्सी, बस, एसी ट्रेन, विमान प्रवास असे पर्याय प्रवाशांकडे आहेत. त्यापेक्षा बुलेट ट्रेन त्यांच्यासाठी कशी फायदेशीर ठरेल यावर मंथन सुरू आहे. हे सर्वेक्षण राष्ट्रीय मार्ग आणि एक्सप्रेसवेच्या जवळपास सुरू करण्यात येईल. अहमदाबाद ते मुंबई ५०८ किलोमीटरचा टप्पा बुलेट ट्रेनसाठी असेल. गुजरातमध्ये ३४८ किमीचे अंतर तर महाराष्ट्रात १५६ किमीची लांबी असेल. महाराष्ट्रात मुंबईत बीकेसी, ठाणे, विरार, भोईसर या स्टेशनची निर्मिती सुरू आहे. तर गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, साबरमती स्टेशन यांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आतापर्यंत ३०० किमीचा वायाडक्टची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईतील BKC स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. ३८३इपिअर वर्क, ४०१ फाऊंडेश आणि ३२६ किमी गर्डरचे काम पण पूर्ण करण्यात आले आहे.



बुलेट ट्रेनचे गुजरातमधील काम तेजीने होत आहे. तर महाराष्ट्रात भूसंपादनाचा विषयी गंभीर झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही भागांविषयी, जंगल अधिग्रहणाविषयी तीव्र मतभेद समोर आले होते. त्यामुळे पर्यावरणाला मोठा धक्का लागण्याची भीती व्यक्त होत होती. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर भारताचा त्या १५ देशांच्या यादीत समावेश होईल, जिथे बुलेट ट्रेन धावते.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत