दापोली-खेड रस्ता बंद! जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा

खेड : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, त्याचा परिणाम दापोली-खेड प्रमुख राज्य मार्गावर दिसून आला आहे. खेड तालुक्यातील फुरुस गावाजवळ पुलाचे काम सुरू असून, यासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी मार्ग पावसामुळे चिखलमय झाला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. आता ही वाहतूक दस्तुरीवरून पालगडमार्गे वळवण्यात आली आहे.


दरम्यान, रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण २२४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुरुड तालुका ३७१ मिमी, श्रीवर्धन ३०७ मिमी, तर सर्वात कमी पेण तालुका ५० मिमी पावसासह सरासरी १४०.५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.



रत्नागिरी जिल्ह्यातही एकूण ९९७.९३ मिमी पाऊस पडला असून, सरासरी ११०.८८ मिमी इतकी नोंद झाली आहे. यामध्ये मंडणगड (२११.२५ मिमी) सर्वाधिक आघाडीवर आहे, तर राजापूर (५९.२५ मिमी) सर्वात कमी पावसाची नोंद आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४६६ मिमी एकूण पाऊस पडला असून, सरासरी ५८.२५ मिमी इतकी नोंद झाली आहे. कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी या तालुक्यांत ६० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.



जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर


जगबुडी नदीवरील भराणे नाका पुलाजवळ सकाळी १० वाजेच्या सुमारास पाण्याची पातळी ५ मीटरवर पोहोचली असून, तीच अलर्ट पातळी असल्याने धोका पातळीच्या अगदी जवळ पाणी पोहोचले आहे.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ३ ते ४ तासांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण