नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार - बावनकुळे

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणे अशक्य


नाशिक : राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होतील आणि या सर्व निवडणुका महायुतीच लढवणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधानसभेप्रमाणेच या निवडणुकांमध्येही महायुती विजयी होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.


मंत्री बावनकुळे नाशिकमधील महसूल आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

बावनकुळे म्हणाले निवडणुका आता कोणालाही पुढे ढकलता येणार नाहीत. पावसाळा संपताच निवडणुकीचे वारे सुरू होतील. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विधानसभेसारखा जोरदार रणसंग्राम पाहायला मिळेल. महायुती म्हणूनच आम्ही या निवडणुका लढवणार आहोत आणि सर्व ठिकाणी आमचाच विजय होईल.

सर्वच निवडणुकांमध्ये महायुतीचे महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून येतील. मुंबईत आमचे मोठे काम सुरू आहे, त्यामुळे मुंबईचा महापौरही महायुतीचाच होईल,असे त्यांनी सांगितले.

नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दावे अनेक 


पालकमंत्री निवडीबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच यावर योग्य निर्णय घेतला जाईल. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार असल्यामुळे त्यांना पालकमंत्री पद पाहिजे आहे तर शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील नाशिकचे पालकमंत्रीपद पाहिजे आहे, त्यामुळे या वादात तूर्तास निर्णय झालेला नाही. दरम्यान भाजपने आपला दावा कायम ठेवल्याचे देखील त्यांनी सांगितले.  शिवसेना (ठाकरे गट) व मनसेसोबत युतीबाबत विचारले असता ते म्हणाले, हे दोन्ही पक्ष प्रगल्भ नेत्यांचे आहेत. योग्य निर्णय तेच घेतील. मला त्यावर बोलायचा अधिकार नाही.

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर ते म्हणाले, ही घटना अतिशय गंभीर आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. सरकारनेही याची गांभीर्याने दखल घेतली आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. बऱ्याच ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि उर्वरितही लवकरच पूर्ण होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
Comments
Add Comment

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

Union Minister Son Arrested : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गंभीर आरोप; दारू पाजून शोषण केल्याचा दावा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) यांचे पुत्र बंडी भगीरथ (Bandi Bhagirath) यांना शनिवारी (१६ मे) तेलंगणा