मान्सून केरळमध्ये दाखल, एक-दोन दिवसांत कोकणात पोहोचणार

  70

आठवडाभर अगोदरच हजेरी, सोळा वर्षांनंतर रेकॉर्ड मोडला


मुंबई  : दरवर्षी बळीराजा ज्या मान्सूनची आतूरतेने वाट बघत असतो, तो मान्सून यंदा वेळेच्याही अगोदर दाखल झाला आहे. तब्बल आठ दिवस अगोदर मान्सूनने केरळमध्ये धडक दिली आहे. २००९ मध्ये मान्सूनने २३ मे रोजी केरळमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर थेट यंदा २०२५ मध्ये मान्सून २४ मे रोजी दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.



एक-दोन दिवसांत कोकणात होणार दाखल


आता पुढील एक ते दोन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. तर मुंबईत १ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.



मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याच्या तारखा


२००९- २३ मे, २०१०- ३१ मे, २०११- २९ मे, २०१२- ५ जून, २०१३ - १ जून, २०१४- ६ जून, २०१५- ५ जून, २०१६- ८ जून, २०१७- ३० मे, २०१८- २९ मे, २०१९- ८ जून, २०२०- १ जून, २०२१- ३ जून, २०२२- २९ जून, २०२३- ८ जून, २०२४- ३० मे.



मान्सूनसाठी पोषक वातावरण


मान्सून शनिवार, दि. २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. शनिवारी मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप भाग, केरळ, माहे, कर्नाटकचा काही भाग, मालदीवचा उर्वरित भाग व कोमोरिन भाग, तामिळनाडूचा अनेक भाग तसेच नैऋत्य, पूर्व-मध्य बंगाल उपसागराचा उर्वरित भाग, पश्चिम-मध्य आणि उत्तर बंगाल उपसागराचा काही भाग आणि मिझोरामचा काही भाग व्यापला आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही