मान्सून केरळमध्ये दाखल, एक-दोन दिवसांत कोकणात पोहोचणार

आठवडाभर अगोदरच हजेरी, सोळा वर्षांनंतर रेकॉर्ड मोडला


मुंबई  : दरवर्षी बळीराजा ज्या मान्सूनची आतूरतेने वाट बघत असतो, तो मान्सून यंदा वेळेच्याही अगोदर दाखल झाला आहे. तब्बल आठ दिवस अगोदर मान्सूनने केरळमध्ये धडक दिली आहे. २००९ मध्ये मान्सूनने २३ मे रोजी केरळमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर थेट यंदा २०२५ मध्ये मान्सून २४ मे रोजी दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.



एक-दोन दिवसांत कोकणात होणार दाखल


आता पुढील एक ते दोन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. तर मुंबईत १ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.



मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याच्या तारखा


२००९- २३ मे, २०१०- ३१ मे, २०११- २९ मे, २०१२- ५ जून, २०१३ - १ जून, २०१४- ६ जून, २०१५- ५ जून, २०१६- ८ जून, २०१७- ३० मे, २०१८- २९ मे, २०१९- ८ जून, २०२०- १ जून, २०२१- ३ जून, २०२२- २९ जून, २०२३- ८ जून, २०२४- ३० मे.



मान्सूनसाठी पोषक वातावरण


मान्सून शनिवार, दि. २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. शनिवारी मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप भाग, केरळ, माहे, कर्नाटकचा काही भाग, मालदीवचा उर्वरित भाग व कोमोरिन भाग, तामिळनाडूचा अनेक भाग तसेच नैऋत्य, पूर्व-मध्य बंगाल उपसागराचा उर्वरित भाग, पश्चिम-मध्य आणि उत्तर बंगाल उपसागराचा काही भाग आणि मिझोरामचा काही भाग व्यापला आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई