Gas Tanker Overturned: ताम्हिणी घाटात विषारी गॅसचा टँकर पलटला

  89

पुणे दिघी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प


माणगांव: पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या डोंगरवाडी गावच्या हद्दीतील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat Accident) गॅस टँकर पलटी झाल्यामुळे, पुणे दिघी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. 25 मे च्या सलग बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाट मार्गावरील रस्त्याच्या साईड पट्टीवरुन माती सरकत आहे, आणि यामुळेच हा अपघात झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.


प्राथमिक माहितीनुसार, ताम्हिणी घाट आणि शेजारील परिसरात सतत होणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या कडेचा दरड सदृश्य भाग कोसळला, दरम्यान या रस्त्यातून जात असताना टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर घटना घडली. तात्काळ आपत्तकालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्याने, संभाव्य धोका टाळण्यास मदत झाली. विषारी गॅस वातावरणात पसरविण्यापासून थांबविण्यात आले.



हायड्रोक्लोरीक गॅसचे वाहतूक करणाऱ्या टँकरचे नुकसान


या अपघातात हायड्रोक्लोरीक ऍसिड वाहतूक करणाऱ्या टँकर चे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन या मार्गांवरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व नागरिक यांच्या माध्यमातून रस्ता मोकळा करण्याचे काम संध्याकाळी उशीरा पर्यंत सुरु होते. या घटनेमुळे डोंगरप्रवण भागातील रस्तासुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी 3 ते 4 तास कालावधी लागू शकतो त्यामुळे सदर मार्गांवरील प्रवास करणाऱ्या वाहतूकदारानी याची नोंद घ्यावी असे आवाहन माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्याकडुन समाज माध्यमे व प्रसारमाध्यमाद्वारे करण्यात आले होते.

Comments
Add Comment

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली