RBI केंद्राला २.६९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देणार

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२४ - २०२५ या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारला २,६८,५९०.०७ कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देणार असल्याचे जाहीर केले. परकीय चलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि सरकारी रोख्यांमध्ये झालेली गुंतवणूक यामुळे रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. याआधी रिझर्व्ह बँकेने २०२३ - २०२४ मध्ये २.१ लाख कोटी रुपये आणि २०२२ - २०२३ मध्ये ८७ हजार ४२० कोटी रुपये लाभांश भारत सरकारला दिला होता.

रिझर्व्ह बँकेमध्ये भारत सरकारची १०० टक्के थेट गुंतवणूक आहे. यामुळे दरवर्षी होणाऱ्या नफ्यातून ठराविक रक्कम लाभांश म्हणून रिझर्व्ह बँक भारत सरकारला हस्तांतरित करते. या रकमेचा वापर सरकारी योजनांसाठी केला जातो. रिझर्व्ह बँक लाभांश दिल्यानंतर उरलेल्या पैशांचा वापर बँकेचे विविध खर्च चालवण्यासाठी करते.

भारत सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ११.२१ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या लाभांशाचा वापर सरकारच्या विविध योजनांमध्ये केला जाईल.
Comments
Add Comment

Golden Triangle : परदेशात २५ मराठी तरुणांचे हाल; बीडच्या तरुणाने केला रॅकेटचा पर्दाफाश

बीड: परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील २५ तरुणांची मानवी तस्करी केल्याचा धक्कादायक

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली  आहे. महामार्ग जेवढा सोईस्कर आणि सुखकर

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

NZ VS ENG : न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का ! एकाच वेळी तीन दिग्गज खेळाडूंनी घेतली निवृत्ती

इंग्लंड खेळाडूंकडून मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर' लंडन : टी-२० महिला वर्ल्ड कप २०२६ मध्ये शनिवारी (२७ जून) ला गविजेता

UP Encounter : उत्तर प्रदेशात २४ तासांत पोलिसांची धडक कारवाई; सात चकमकींत दोन कुख्यात गुन्हेगार ठार

उत्तर प्रदेश: गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेश पोलीस आणि विशेष कृती दलाने (STF) राज्यभरात धडक कारवाई करत गुन्हेगारी