RBI केंद्राला २.६९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देणार

  86

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२४ - २०२५ या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारला २,६८,५९०.०७ कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देणार असल्याचे जाहीर केले. परकीय चलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि सरकारी रोख्यांमध्ये झालेली गुंतवणूक यामुळे रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. याआधी रिझर्व्ह बँकेने २०२३ - २०२४ मध्ये २.१ लाख कोटी रुपये आणि २०२२ - २०२३ मध्ये ८७ हजार ४२० कोटी रुपये लाभांश भारत सरकारला दिला होता.

रिझर्व्ह बँकेमध्ये भारत सरकारची १०० टक्के थेट गुंतवणूक आहे. यामुळे दरवर्षी होणाऱ्या नफ्यातून ठराविक रक्कम लाभांश म्हणून रिझर्व्ह बँक भारत सरकारला हस्तांतरित करते. या रकमेचा वापर सरकारी योजनांसाठी केला जातो. रिझर्व्ह बँक लाभांश दिल्यानंतर उरलेल्या पैशांचा वापर बँकेचे विविध खर्च चालवण्यासाठी करते.

भारत सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ११.२१ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या लाभांशाचा वापर सरकारच्या विविध योजनांमध्ये केला जाईल.
Comments
Add Comment

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक