RBI केंद्राला २.६९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देणार

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२४ - २०२५ या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारला २,६८,५९०.०७ कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देणार असल्याचे जाहीर केले. परकीय चलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि सरकारी रोख्यांमध्ये झालेली गुंतवणूक यामुळे रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. याआधी रिझर्व्ह बँकेने २०२३ - २०२४ मध्ये २.१ लाख कोटी रुपये आणि २०२२ - २०२३ मध्ये ८७ हजार ४२० कोटी रुपये लाभांश भारत सरकारला दिला होता.

रिझर्व्ह बँकेमध्ये भारत सरकारची १०० टक्के थेट गुंतवणूक आहे. यामुळे दरवर्षी होणाऱ्या नफ्यातून ठराविक रक्कम लाभांश म्हणून रिझर्व्ह बँक भारत सरकारला हस्तांतरित करते. या रकमेचा वापर सरकारी योजनांसाठी केला जातो. रिझर्व्ह बँक लाभांश दिल्यानंतर उरलेल्या पैशांचा वापर बँकेचे विविध खर्च चालवण्यासाठी करते.

भारत सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ११.२१ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या लाभांशाचा वापर सरकारच्या विविध योजनांमध्ये केला जाईल.
Comments
Add Comment

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारकडून विशेष खबरदारी

महिलांसाठीच्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार मुंबई : महिलांवरील हिंसाचार,

Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात हालचालींना वेग; लवकरच अध्यक्षपदाचा तिढा सुटणार

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

BMC Mayor Election 2026: मुंबईच्या उपमहापौर पदासाठी शिंदे गटाकडून 'या' दोन महिलांच्या नावाची चर्चा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौरपदाबाबतची उत्सुकात शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग

Gold and silver ETF Prices: सोने-चांदीच्या ETF किमतीत ९ टक्क्यांनी वाढ

मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार (US-India Trade Deal) झाला आहे. स्वतः

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत