बियाणे खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके

कृषी विभागाची खते, बियाण्यांवर करडी नजर


पालघर : शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कृषि निविष्ठा (बियाणे, खते, कीटकनाशके) उपलब्ध व्हावीत, तसेच बियाणे खतांचा काळाबाजार होऊ नये यासाठी कृषि विभागामार्फत जिल्हास्तरीय एक आणि तालुकास्तरीय आठ अशी एकूण नऊ भरारी पथके पालघर जिल्ह्यात गठित करण्यात आली आहेत.



शेतकऱ्यांना बी- बियाणे विक्री करताना बनावट कंपन्यांची बियाणे विकणे, खताची साठवणूक करून काळाबाजार करणे, बियाणे कीटकनाशकांच्या विक्रीत फसवणूक करणे अशा अनेक तक्रारी दरवर्षी शेतकऱ्यांकडून केल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये सोबतच त्यांना दर्जेदार बियाणे, खत, कीटकनाशके उपलब्ध व्हावीत यासाठी भरारी पथक नेमण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख म्हणून कृषि विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी हे असणार आहेत. या पथकात विश्वास बर्वे, ए.जे. राऊळ , काकासाहेब भालेकर आणि लक्ष्मण लामकाने यांचा समावेश आहे.


तसेच प्रत्येक तालुक्यात तालुका कृषि अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये तालुका कृषि अधिकारी (पथक प्रमुख), तर कृषि अधिकारी (तालुका कार्यालय), निरीक्षक वजने व मापे, मंडळ कृषि अधिकारी आणि गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (पंचायत समिती) यांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

पहिल्या नऊ महिन्यातच मुंबईत रियल इस्टेट बाजारात चार पटीने गुंतवणूकीत वाढ! 'ही' आहे आकडेवारी

मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण