स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांनी तयार राहा - फडणवीस

सांगली : राज्यात कार्यकाळ संपुष्टात येऊनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रतिक्षित आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना त्याचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगाने तयारी देखील सुरू आहे. दरम्यान आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मनपा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी तयार राहा, असे आदेश दिले आहेत. तसेच जिथे निवडणुका जिंकाल तिथे मोठ्या प्रमाणावर निधी देऊ, असे आश्वासन देखील दिले आहे. ते सांगलीत भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

स्थानिक स्वराज्य संस्था सरकारच्या ताब्यात असल्या की काम चांगलं होतं, नाहीतर विकासाला खीळ बसते. त्यामुळे कार्यकर्त्यांना कामाला लागा, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका जाहीर होतील. जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका एकत्र होतील किंवा 5-6 दिवसांचं अंतर असेल. त्यानंतर 15 दिवसांनी महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या. न्यायालयाच्या या आदेशानंतरच आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे.
Comments
Add Comment

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा