Chhagan Bhujbal : भुजबळांचा मंत्रिमंडळात पुनर्प्रवेश : मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक मारलाय. सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला. मात्र छगन भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याचा समावेश करून ओबीसी समाजाशी जवळीक कायम राखण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नाशिकमध्ये ताकद कशी वाढेल, याचाही विचार करण्यात आला आहे. जाणून घेऊया या लेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राजकीय खेळी.



ओबीसींचे वजनदार नेते म्हणजे छगन भुजबळ. याच भुजबळांचा मंत्रिमंडळात सामावेश करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरट्रोक मारलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यात सत्ता - संतुलनाचा डाव खेळला आहेच, आपलं सरकार सामाजिक समतोल कसं साधतं हेही तेवढ्याच ताकदीने दाखवून दिलं. भुजबळांचा समावेश करून मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाशी राजकीय जवळीक मजबूत केलीय. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात वाढत असलेली अस्वस्थता शांत करण्याचा प्रयत्नही यात दिसतो. हा निर्णय फक्त भुजबळांनाच मंत्रिपद देण्यापुरता मर्यादित नाही, तर ओबीसी समाजाला पुन्हा एकदा भाजपाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांची ही निवडणूक रणनीती भाजपासाठी फायद्याची ठरू शकते. मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. बीडचं सरपंच संतोष देशमुख प्रकरण गाजतंय.



धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. याचा परिणाम म्हणून ओबीसींमध्ये काहीशी नाराजी होती. मात्र धनंजय मुंडेंची दारे बंद करून भुजबळांसाठी ती उघडण्यात आली. मुंडेंपेक्षा भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देणं राष्ट्रवादीसाठी पर्यायाने महायुतीला सोयीस्कर ठरलं. भुजबळांच्या समावेशाने राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदाचा कोटाही संपला आणि तगडा, अभ्यासू नेताही मिळाला. छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातील समावेश हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात आलाय. कारण बीड प्रकरणात धनंजय मुंडेंची मोठी बदनामी झालीय. त्यातच राष्ट्रवादीकडे मोठा ओबीसी चेहरा नव्हता. मंत्रिमंडळात स्थान देऊन भुजबळांची नाराजी दूर करण्यात आली. बीडचा विचार करता धनंजय मुंडे नसले तरी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे परिस्थिती हाताळू शकतील. काहीही असलं तरी पंकजा मुंडेंची बीडवरील राजकीय पकड भाजपाच्या फायद्याची ठरणार आहे.

छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रभावी नेतृत्व. त्यांच्या पुनर्प्रवेशामुळे ओबीसी समाजाचा मोठा वर्ग महायुतीकडे वळू शकतो. भुजबळ हे पूर्वी शरद पवारांच्या गोटात होते. आता ते अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत आहेत. भुजबळांमुळे पवार गटाचे आणखी काही नेते महायुतीकडे येण्याची शक्यता आहे. ही शक्यता निवडणुकीआधी प्रत्यक्षात आल्यास शरद पवार गटाला फटका बसू शकतो. हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीचे यश मानले जाते. त्याचबरोबर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ओबीसींमध्ये निर्माण होणारी धुसफुसही थांबवण्यात मुख्यमंत्र्‍यांना यश आलंय.

नाशिक जिल्ह्यात छगन भजुबळ यांची मजबूत पकड आहे. ते नाशिकच्या ओबीसी समाजाचे विशेषतः माळी समाजाचे अत्यंत प्रभावशाली नेते आहेत. त्यामुळे भाजपाला माळी समाजातील मतांचा मोठा फायदा होऊ शकतो. नाशिकमधील भुजबळांच्या कार्याचा, राजकीय वर्चस्वाचा, विकासात्मक कामाचा भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही फायदा होऊ शकतो. गिरीश महाजन यांच्यावर नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आलीय. भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने भाजपावरचा भार कमी होईल आणि मतविभाजन झाल्याने फायदाही होईल. भाजपाला नाशिकमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हे सामाजिक समीकरण सांभाळण्यासाठी भुजबळ प्रभावी चेहरा ठरू शकतात. भुजबळांचा सहभाग हा नाशिक मनपात भाजपाच्या विजयासाठी मतांचे ध्रुवीकरण साधणारा आणि स्थानिक पातळीवर नेतृत्व बळकट करणारा निर्णय ठरू शकतो.

एकूणच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेणे म्हणजे एक राजकीय मास्टरस्ट्रोक आहे. भाजपाने मराठा आणि ओबीसी समाजातील असंतोष एकाच वेळी सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. तर धनंजय मुंडेंची उणीव भासणार नाही याचीही काळजी घेतलीय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या या राजकीय खेळीचा फायदा केवळ सध्याच्या सरकारला नाही, तर आगामी निवडणुकांत भाजपाला व्यापक सामाजिक आधार मिळवून देणारा ठरू शकतो. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय डावपेचात आपण एक्का असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केलंय.
Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना