माझ्यासाठी प्रयत्न मुख्यमंत्र्यांचे, पण मी मंत्री राष्ट्रवादीचाच; मंत्री छगन भुजबळ यांचा निर्वाळा

नागपूर : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मी असावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितच आग्रही होते. त्यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. तथापि मी भाजपाचा मंत्री नसून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून झालेलो मंत्री आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे नवनियुक्त अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.
मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर छगन भुजबळ हे प्रथमच नागपूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.


भुजबळ म्हणाले, की राज्यात जेव्हा भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला, त्यावेळी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला मंत्री करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय मला मंत्री करण्याचा नव्हता. त्यामुळे मी त्यावेळेला मंत्री होऊ शकलो नाही. या वेळेला मात्र दिल्लीतील आणि भाजपातील वरिष्ठ नेतृत्वाने प्रयत्न केले आणि या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही सहमती दर्शवली आणि त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा येऊ शकलो.



मुंडेंची जबाबदारी भुजबळांकडे


भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा खाते जाहीर करण्यात आले आहे. अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्या वेळी फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्याकडे या खात्याचा चार्ज होता. आता अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन