जिल्ह्यातील १०८ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

  41

मुसळधार पावसामुळे नागरिकांना दिलासा


रत्नागिरी:मुसळधार पावसाने पाणीटंचाईवर खर्च होणारे शासनाचे लाखो रूपये वाचवले आहेत. तर दापोली, गुहागर, राजापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांनी पाणी नियोजनाचा आराखडा राबविल्याने याठिकाणी एकही टँकर लागला नाही. त्यामुळे त्यावर खर्च होणारे पैसेही वाचले आहेत.


त्याचे सर्व श्रेय तेथील ग्रामपंचायती तसेच गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीला जात असल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले़ सोमवार १९ मे पर्यंत टँकरने १ हजार ३ फेऱ्यांद्वारे २६ हजार ७०९ नागरिकांना पाण्याचे वाटप केले. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक जास्त ४८ वाड्यांना पाणीटंचाई भासल्याने ७६८ फेऱ्या टँकर फेऱ्यांद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला़ त्यामध्ये सर्वाधिक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ४७ गावातील १०८ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामध्ये सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यात शासकीय एकही टँकर न लावता ८ खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. तर दरवर्षी पाणीटंचाई भासणाऱ्या दापोली, गुहागर, राजापूर तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला नाही. मात्र सहा तालुक्यांना शासकीय तसेच खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला़ मंडणगड तालुक्यात शासकीय टँकर नसल्याने एका टँकरद्वारे एका वाडीला पाणीपुरवठा करण्यात आला़ खेड तालुक्यात एका शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला तर चिपळूण तालुक्यात ९ गावातील १३ वाड्यांना एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला़ संगमेश्वर तालुक्यात १३ गावातील २६ वाड्यांना एक शासकीय तर २ खासगी टँकरद्वारे ५६ फेऱ्यांमधून ६,७९३ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात आला़ लांजा तालुक्यातील २ गावातील ३ वाड्यांना एका टँकरद्वारे फक्त १० फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.


रत्नागिरी तालुक्यातील ९ गावांमध्ये असणाऱ्या ४८ वाड्यांना ८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असून त्यामध्ये शिरगाव गावातील ८ वाड्या, सडामिऱ्या गावातील ६ वाड्या,केळ्ये गावातील ९ वाड्या, जांभारी गावातील १० वाड्यांचा समावेश आहे़

Comments
Add Comment

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी