कोकण विभागात बांधकाम उपविभाग अव्वल

  24

मोखाडा: महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन १०० दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत मोखाडा सार्वजनिक बांधकाम उप विभाग मोखाडा कार्यालयाच्या कोकण विभागातून प्रथम क्रमांकावर आले आहे. या मोहिमेत शासकीय कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवादी साधने, नागरिकांना वेळेवर सेवा देणे, आदी घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. उपअभियंता विशाल अहिरराव यांनी कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्यात कामात गुणात्मक सुधारणा घडवून आणली आहे.


राज्यभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसांचा कृती आराखडा हा उपक्रम राबवण्यात आला. कोकण विभागातील बांधकाम विभागाच्या श्रेणीत मोखाडा उपविभाग प्रथम आल्याने या कार्यालयाचे प्रमुख अहिरराव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. बांधकाम विभाग म्हटले की, भ्रष्टाचार आणि तत्सम बाबीचीच जास्त चर्चा नेहमी होत असते मात्र पहिल्यांदाच हे कार्यालय प्रशंसा करण्याच्या कसोटीवर खरे उतरले असून प्रशासन, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता, अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट,कार्यालयीन सोयी सुविधा,नावीन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक तक्रार निवारण प्रणाली या सारख्या अनेक विभागांत सुधारणा केल्या मुळे हे यश प्राप्त झाले आहे.



काम गुणवत्तापूर्वक करण्याचे प्रयत्न


या यशाचे श्रेय माझ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना जाते तसेच आमचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी वेळोवेळी आमचे मनोबल वाढवले असे अहिरराव यांनी बोलताना सांगितले आहे.अधिकारी लोकप्रतिनिधी, यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री यांना अपेक्षित लोकाभिमुख, गतिमान पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या १०० दिवसांत विशेष प्रयत्न करण्यात आले. या पुढेही असेच काम अविरत सुरू राहील.

Comments
Add Comment

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील

जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे

आणीबाणी काळ म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई !

पालघर: संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना २५ जून १९७५ रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या

सूर्या प्रकल्पातून वाढीव पाणी मिळणार नाही

पालघरसह २० गावांना शोधावा लागणार दुसरा पर्याय गणेश पाटील पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांना

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी एनएचआयला पत्र

व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात तलासरी : मुंबई-अहमदाबादबाद महामार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत,

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत?

सफाळे: पालघर जिल्ह्यातील मांडे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-अहमदाबाद अतिजलद (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचे काम वेगाने