कोकण विभागात बांधकाम उपविभाग अव्वल

मोखाडा: महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन १०० दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत मोखाडा सार्वजनिक बांधकाम उप विभाग मोखाडा कार्यालयाच्या कोकण विभागातून प्रथम क्रमांकावर आले आहे. या मोहिमेत शासकीय कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवादी साधने, नागरिकांना वेळेवर सेवा देणे, आदी घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. उपअभियंता विशाल अहिरराव यांनी कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्यात कामात गुणात्मक सुधारणा घडवून आणली आहे.


राज्यभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसांचा कृती आराखडा हा उपक्रम राबवण्यात आला. कोकण विभागातील बांधकाम विभागाच्या श्रेणीत मोखाडा उपविभाग प्रथम आल्याने या कार्यालयाचे प्रमुख अहिरराव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. बांधकाम विभाग म्हटले की, भ्रष्टाचार आणि तत्सम बाबीचीच जास्त चर्चा नेहमी होत असते मात्र पहिल्यांदाच हे कार्यालय प्रशंसा करण्याच्या कसोटीवर खरे उतरले असून प्रशासन, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता, अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट,कार्यालयीन सोयी सुविधा,नावीन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक तक्रार निवारण प्रणाली या सारख्या अनेक विभागांत सुधारणा केल्या मुळे हे यश प्राप्त झाले आहे.



काम गुणवत्तापूर्वक करण्याचे प्रयत्न


या यशाचे श्रेय माझ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना जाते तसेच आमचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी वेळोवेळी आमचे मनोबल वाढवले असे अहिरराव यांनी बोलताना सांगितले आहे.अधिकारी लोकप्रतिनिधी, यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री यांना अपेक्षित लोकाभिमुख, गतिमान पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या १०० दिवसांत विशेष प्रयत्न करण्यात आले. या पुढेही असेच काम अविरत सुरू राहील.

Comments
Add Comment

मच्छीमारांना आता क्यूआर कोडचे ओळखपत्र

हानिकारक मासेमारीवर बंदी नवीन नियमानुसार, एलईडीद्वारे मासे पकडणे, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंगसारख्या

पालघर नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे!

मोबिन शेख पालघर : आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढली असून तिरंगी लढतीचे संकेत

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील