कोकण विभागात बांधकाम उपविभाग अव्वल

मोखाडा: महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन १०० दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत मोखाडा सार्वजनिक बांधकाम उप विभाग मोखाडा कार्यालयाच्या कोकण विभागातून प्रथम क्रमांकावर आले आहे. या मोहिमेत शासकीय कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवादी साधने, नागरिकांना वेळेवर सेवा देणे, आदी घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. उपअभियंता विशाल अहिरराव यांनी कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्यात कामात गुणात्मक सुधारणा घडवून आणली आहे.


राज्यभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसांचा कृती आराखडा हा उपक्रम राबवण्यात आला. कोकण विभागातील बांधकाम विभागाच्या श्रेणीत मोखाडा उपविभाग प्रथम आल्याने या कार्यालयाचे प्रमुख अहिरराव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. बांधकाम विभाग म्हटले की, भ्रष्टाचार आणि तत्सम बाबीचीच जास्त चर्चा नेहमी होत असते मात्र पहिल्यांदाच हे कार्यालय प्रशंसा करण्याच्या कसोटीवर खरे उतरले असून प्रशासन, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता, अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट,कार्यालयीन सोयी सुविधा,नावीन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक तक्रार निवारण प्रणाली या सारख्या अनेक विभागांत सुधारणा केल्या मुळे हे यश प्राप्त झाले आहे.



काम गुणवत्तापूर्वक करण्याचे प्रयत्न


या यशाचे श्रेय माझ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना जाते तसेच आमचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी वेळोवेळी आमचे मनोबल वाढवले असे अहिरराव यांनी बोलताना सांगितले आहे.अधिकारी लोकप्रतिनिधी, यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री यांना अपेक्षित लोकाभिमुख, गतिमान पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या १०० दिवसांत विशेष प्रयत्न करण्यात आले. या पुढेही असेच काम अविरत सुरू राहील.

Comments
Add Comment

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही