मुसळधार पावसातही तहानलेल्यांना १७० टँकरचा आधार

६५३ गाव-वाड्यातील तीन लाख नाशिककर पाण्यासाठी व्याकुळ


नाशिक :मे महिन्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानाही टंचाईची तीव्रता कायम आहे. सद्यस्थितीत १२ तालुक्यातील ६५३ गाव-वाड्यांना १७० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील तीन लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.


दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या वळिवाच्या पावसाने जणू पावसाळा सुरू झाल्याची स्थिती आहे. शहरातील प्रमुख रस्ते व चौकांना तलावाचे स्वरुप प्राप्त होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे चटके काहिसे कमी होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. सध्या १७९ गावे आणि ४७४ वाड्या अशा एकूण ६५३ ठिकाणी टँकरने पाणी द्यावे लागत असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे.



पाणी टंचाईची सर्वाधिक झळ नांदगाव तालुक्यास (१५३ गाव-वाडी) बसली. त्याखालोखाल येवला (१२५), सिन्नर (१००), इगतपुरी (७५), मालेगाव (५४), चांदवड (४२), पेठ(३०), त्र्यंबकेश्वर (२५), सुरगाणा(२३), देवळा (१२), कळवण (आठ), बागलाण तालुक्यात (सहा) गाव-वाड्यांचा समावेश आहे.



नाशिक, निफाड, दिंडोरी तालुके टँकरमुक्त 


१२ तालुक्यातील शेकडो गावांना पाणीटंचाईची झळ बसत असताना नाशिक, निफाड आणि दिंडोरी हे तीन तालुके मात्र संपूर्ण उन्हाळ्यात टँकरमुक्त राहिले आहेत. या भागातील एखाद्या गावाची तहान भागविण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करण्याची वेळ आलेली नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.



जिल्ह्यात ७७ खासगी विहिरी अधिग्रहित


गावांची तहान भागविण्यासह टँकरसाठी जिल्ह्यात ७७ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात गावांसाठी १७, तर टँकरसाठी ६० विहिरींचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक १७, इगतपुरी १६, पेठ आठ, सुरगाणा सहा, बागलाण आणि येवल्यात प्रत्येकी तीन, चांदवड, देवळा, मालेगाव कळवण तालुक्यात प्रत्येकी दोन, सिन्नरमधील एका विहिरीचा समावेश आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी