गोखले पुलावर शुक्रवारपासून बससेवा

प्रारंभी तीन बसमार्ग धावणार


मुंबई : २०२२ मध्ये बंद करण्यात आलेला गोखले पूल अडीच वर्षांनी पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, पूल सुरु होऊन अजूनही बेस्ट बस सेवा यावरून सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना या पुलावरून बस सेवा केव्हा पूर्ववत होणार याची प्रतीक्षा होती. बेस्ट प्रशासनाकडून गोखले पुलावरील बससेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु असून, सर्वेक्षणानंतर लवकरच ही बससेवा सुरु करू, असे सांगितले जात होते.अखेर शक्रवार २३ मे पासून बेस्टने, ए ३५९ ए ४२२ व ४२४ हे बसमार्ग पुन्हा गोखले पुलावरून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.




गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्यानंतर यावरील बस सेवा इतर मार्गानी वळवण्यात आली होती, तर काही बसमार्ग खंडित करण्यात आले होते. तर दुसरा काहीच पर्याय नसल्याने तीन बसमार्ग पूर्णतः बंद करावे लागले होते . हा महत्वाचा पूल बंद केल्याने पूर्व - पश्चिम प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत होते शिवाय वाहतूककोंडीत भर पडली. त्यामुळे आता गोखले पूर्ण क्षमतेने झाल्यानंतर बससेवा तात्काळ सुरु करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती.
फेब्रुवारी मध्ये गोखले पुलाची एक मार्गिका खुली झाल्यानंतर सातत्याने स्थानिकांकडून बसमार्ग पूर्ववत करण्याची मागणी सुरु होती . उद्या शनिवार २३ मे पासून बेस्टने ए ४२२- वांद्रे आगार ते विक्रोळी आगार-, ए ३५९ - हिरानंदानी (पवई ) बस स्थानक ते मालवणी आगार व ४२४ - गोरेगांव आगार ते मुलुंड स्थानक (पश्चिम)- असे तीन बस मार्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हि बससेवा सुरु झाल्याने पूर्व पश्चिम जाणाऱ्या व लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.



मुंबईत अनेक विकासकामांमुळे बेस्टचे बसमार्ग वळवले जातात वा खंडित केले जातात. गोखले पुलाचे काम सुरू झाल्यामुळे या मार्गावरून जाणारे दहा बसमार्ग बंद आहेत. तर काही मार्ग पर्यायी रस्त्याने वळविण्यात आले आहेत.या पुलाच्या पादचारी मार्गाचा भाग २०१८ मध्ये पडला. तेव्हापासून हा पूल बंद करण्यात आला होता.

Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा