गोखले पुलावर शुक्रवारपासून बससेवा

  58

प्रारंभी तीन बसमार्ग धावणार


मुंबई : २०२२ मध्ये बंद करण्यात आलेला गोखले पूल अडीच वर्षांनी पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, पूल सुरु होऊन अजूनही बेस्ट बस सेवा यावरून सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना या पुलावरून बस सेवा केव्हा पूर्ववत होणार याची प्रतीक्षा होती. बेस्ट प्रशासनाकडून गोखले पुलावरील बससेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु असून, सर्वेक्षणानंतर लवकरच ही बससेवा सुरु करू, असे सांगितले जात होते.अखेर शक्रवार २३ मे पासून बेस्टने, ए ३५९ ए ४२२ व ४२४ हे बसमार्ग पुन्हा गोखले पुलावरून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.




गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्यानंतर यावरील बस सेवा इतर मार्गानी वळवण्यात आली होती, तर काही बसमार्ग खंडित करण्यात आले होते. तर दुसरा काहीच पर्याय नसल्याने तीन बसमार्ग पूर्णतः बंद करावे लागले होते . हा महत्वाचा पूल बंद केल्याने पूर्व - पश्चिम प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत होते शिवाय वाहतूककोंडीत भर पडली. त्यामुळे आता गोखले पूर्ण क्षमतेने झाल्यानंतर बससेवा तात्काळ सुरु करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती.
फेब्रुवारी मध्ये गोखले पुलाची एक मार्गिका खुली झाल्यानंतर सातत्याने स्थानिकांकडून बसमार्ग पूर्ववत करण्याची मागणी सुरु होती . उद्या शनिवार २३ मे पासून बेस्टने ए ४२२- वांद्रे आगार ते विक्रोळी आगार-, ए ३५९ - हिरानंदानी (पवई ) बस स्थानक ते मालवणी आगार व ४२४ - गोरेगांव आगार ते मुलुंड स्थानक (पश्चिम)- असे तीन बस मार्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हि बससेवा सुरु झाल्याने पूर्व पश्चिम जाणाऱ्या व लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.



मुंबईत अनेक विकासकामांमुळे बेस्टचे बसमार्ग वळवले जातात वा खंडित केले जातात. गोखले पुलाचे काम सुरू झाल्यामुळे या मार्गावरून जाणारे दहा बसमार्ग बंद आहेत. तर काही मार्ग पर्यायी रस्त्याने वळविण्यात आले आहेत.या पुलाच्या पादचारी मार्गाचा भाग २०१८ मध्ये पडला. तेव्हापासून हा पूल बंद करण्यात आला होता.

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत