दोन दिवसांच्या वादळी पावसाने २,१२४ घरांची पडझड

  45

मदतीसाठी शासनाकडे मागितला सव्वा कोटींचा निधी


पालघर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ६ व ७ मे झालेल्या वादळी वारा व पावसामुळे आठ तालुक्यात २ हजार १२४ घरांचे नुकसान झाले आहे. पालघर आणि डहाणू तालुक्यातील घरांची जास्त पडझड झाली आहे. पालघर तालुक्यात ५५० तर डहाणू तालुक्यातील ६५२ घरांचे नुकसान झाल्याचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात ६ मे च्या सायंकाळपासूनच वादळी वारा व पावसाने हजेरी लावली. ७ आणि ८ मेला सुद्धा पावसाचा जोर कायम होता. वादळी वाऱ्यामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडल्याने बहुतांश भाग अंधारात होता. ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.


शेतीपिकांचे व फळबागांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे घरांचे नुकसान झाले. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी तत्काळ नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली असून महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात २ हजार १२४ घरांचे नुकसान झाले आहे. वाडा तालुक्यातील ९५ पक्क्या घरांचे तर २८ कच्च्या घरांचे नुकसान झाले असून, वसई तालुक्यात ८७ पक्की घरे, ५५ कच्ची घरे, जव्हार तालुक्यातील २०१ पक्क्या घरांचे मोखाडा तालुक्यातील १२९ पक्की घरे आणि ३० कच्ची घरे, पालघर तालुक्यातील ४४८ कच्ची घरे तर १०२ पक्की घरे, डहाणू तालुक्यातील ५९७ पक्की आणि ५१ कच्ची घरे, विक्रमगड तालुक्यातील १७८ पक्की आणि २८ कच्ची घरे आणि तलासरी तालुक्यातील ७२ पक्क्या घरांचे तर ५५ कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.


वादळी वारा आणि पावसाने जिल्ह्यात २ हजार १२४ घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. लवकरच नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात येईल.
- सुभाष भागडे, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर
Comments
Add Comment

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,