IPL 2025 : आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, BCCI कडून नवा नियम जारी

मुंबई : आयपीएल २०२५च्या लीग टप्प्यातील उर्वरित ९ सामन्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात मान्सून पूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच कोणतेही उर्वरित सामने पावसामुळे रद्द होऊ नये, यासाठी BCCI कडून एक नवा नियम जारी करण्यात आला आहे. स्पर्धेच्या पुढील सामन्यांसाठी अतिरिक्त २ तासांचा वेळ वाढवण्यात आला. पावसाच्या शक्यतेमुळे हा बदल करण्यात आला.


आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना (१७ मे २०२५) पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर आता बीसीसीआयने निर्णयात बदल केला आहे. यापुढे आयपीएलच्या पुढील सामन्यात पावसाने व्यत्यय आणले तर हा सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त २ तासांचा वेळ वाढवून दिला जाणार आहे. सहसा २ तासांचा अतिरिक्त वेळ नियम फक्त प्लेऑफ सामन्यांसाठी लागू केला जातो. मात्र, आता पावसाच्या शक्यतेमुळे लीग सामन्यांनाही अतिरिक्त वेळेचा नियम लागू करण्यात आला. आयपीएल २०२५ मधील आतापर्यंत ३ सामने पावसामुळे रद्द झाले.



सीएसके विरुद्ध आरआर सामन्यानंतर लीग टप्प्यात एकूण ८ सामने शिल्लक राहतील, यातील ७ सामने संध्याकाळी खेळवले जातील. नियमांनुसार, दुपारी खेळला जाणारा सामना संध्याकाळी ६:५० वाजता संपला पाहिजे. तर संध्याकाळी सुरू होणारा सामना रात्री १०:५० वाजता संपला पाहिजे. नवीन नियमांनुसार, दुपारी सुरू होणारा सामना संध्याकाळी ५:३० वाजता सुरू झाला तर एकही षटक कापले जाणार नाही. संध्याकाळी होणारा सामना रात्री ९:३० सुरू झाल्यास सामना एकही षटक कापले जाणार नाही.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत