तापमान वाढीमुळे केळी नामशेष होणार?

मुंबई : हवामान बदलामुळे वाढलेल्या तापमानासह विविध नैसर्गिक आपत्तींचा जगभरातील शेतीला मोठा फटका बसतो आहे. अतिवृष्टी, अति उष्णता, अति थंडीसह गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका केळी पिकाला बसतो आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरातील ६० टक्के केळी लागवडीला फटका बसला आहे. यंदा जळगाव परिसरातील केळीवरही तापमान वाढीचा परिणाम दिसून आला आहे.


‘ख्रिश्चन एड’ या संशोधन संस्थेने ‘गोइंग बनानाज: हाउ क्लाइमेट चेंज थ्रेट्स द वर्ल्ड्स फेवरेट फ्रूट’ या संशोधन अहवालात हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि तापमान वाढीचा केळी पिकावरील परिणामांचा आढावा घेतला आहे. त्यात म्हटले आहे. केळी हे गहू, तांदूळ आणि मक्यानंतर सर्वाधिक आयात होणारे फळ आहे.



जागतिक व्यापाराच्या आणि पोषण मूल्याच्या दृष्टीनेही केळी महत्त्वपूर्ण आहे. पण, हवामान बदलामुळे प्रामुख्याने तापमान वाढीसह अति थंडी, गारपीट, वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे लॉटिन अमेरिका, कॅरेबियन देशांना तापमान वाढीचा सर्वाधिक फटका बसत असून, २०८० पर्यंत एकूण केळी लागवडीपैकी ८० टक्के आणि जगातील अन्य केळी उत्पादक देशांमधील ६० टक्के क्षेत्र नष्ट होण्याची भीती आहे. सध्या एकूण जागतिक केळी लागवडीच्या ६० टक्के क्षेत्राला तापमान वाढीच्या परिणामांचा सामना करावा लागत आहे.


तापमान वाढीमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढतो. केळीचे खोड, झाड कमकुवत होते. अशा काळात वादळी वारे, सोसायट्याचा वारे वाहिल्यास केळीची झाडे मोडून पडतात. तापमान वाढीमुळे ब्लॅक लीफ फंगस, या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, ही बुरशी केळीसाठी धोकादायक ठरत आहे. ब्लॅक लीफ फंगसमुळे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत तब्बल ८० टक्के कमी होते. ओलसर जागेत वेगाने प्रादुर्भाव होतो. त्यामुळे सध्या जगभरात तापमान वाढीमुळे केळी उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहेत.

Comments
Add Comment

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा