तापमान वाढीमुळे केळी नामशेष होणार?

  36

मुंबई : हवामान बदलामुळे वाढलेल्या तापमानासह विविध नैसर्गिक आपत्तींचा जगभरातील शेतीला मोठा फटका बसतो आहे. अतिवृष्टी, अति उष्णता, अति थंडीसह गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका केळी पिकाला बसतो आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरातील ६० टक्के केळी लागवडीला फटका बसला आहे. यंदा जळगाव परिसरातील केळीवरही तापमान वाढीचा परिणाम दिसून आला आहे.


‘ख्रिश्चन एड’ या संशोधन संस्थेने ‘गोइंग बनानाज: हाउ क्लाइमेट चेंज थ्रेट्स द वर्ल्ड्स फेवरेट फ्रूट’ या संशोधन अहवालात हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि तापमान वाढीचा केळी पिकावरील परिणामांचा आढावा घेतला आहे. त्यात म्हटले आहे. केळी हे गहू, तांदूळ आणि मक्यानंतर सर्वाधिक आयात होणारे फळ आहे.



जागतिक व्यापाराच्या आणि पोषण मूल्याच्या दृष्टीनेही केळी महत्त्वपूर्ण आहे. पण, हवामान बदलामुळे प्रामुख्याने तापमान वाढीसह अति थंडी, गारपीट, वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे लॉटिन अमेरिका, कॅरेबियन देशांना तापमान वाढीचा सर्वाधिक फटका बसत असून, २०८० पर्यंत एकूण केळी लागवडीपैकी ८० टक्के आणि जगातील अन्य केळी उत्पादक देशांमधील ६० टक्के क्षेत्र नष्ट होण्याची भीती आहे. सध्या एकूण जागतिक केळी लागवडीच्या ६० टक्के क्षेत्राला तापमान वाढीच्या परिणामांचा सामना करावा लागत आहे.


तापमान वाढीमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढतो. केळीचे खोड, झाड कमकुवत होते. अशा काळात वादळी वारे, सोसायट्याचा वारे वाहिल्यास केळीची झाडे मोडून पडतात. तापमान वाढीमुळे ब्लॅक लीफ फंगस, या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, ही बुरशी केळीसाठी धोकादायक ठरत आहे. ब्लॅक लीफ फंगसमुळे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत तब्बल ८० टक्के कमी होते. ओलसर जागेत वेगाने प्रादुर्भाव होतो. त्यामुळे सध्या जगभरात तापमान वाढीमुळे केळी उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहेत.

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने