11th admission: अकरावी प्रवेशासाठी पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यभर अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया लागू केली आहे. त्यासाठी राज्यभरातील ९,२९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ ते २८ मेदरम्यान खुली राहणार आहे.

पहिल्या फेरीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना शंभर रुपये शुल्क भरावे लागेल आणि एक ते दहा प्राधान्यक्रम निवडता येतील. तात्पुरती गुणवत्ता यादी ३० मे रोजी, अंतिम यादी ३ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते १२ जूनदरम्यान प्रवेश घ्यावा लागेल.

या प्रक्रियेसाठी https://mahafyjcadmissions.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध असून, २० लाखांहून अधिक जागा विविध शाखांसाठी आहेत. राखीव कोट्यांसाठीही अर्ज करता येणार असून, त्यावर प्रवेश ५ जूनपासून सुरू होतील.

विद्यार्थ्यांसाठी १९ व २० मे रोजी अर्ज भरण्याचा सराव ठेवण्यात येणार असून २० मेच्या रात्री संकेतस्थळावरून तो अर्ज हटवण्यात येईल व २१ मे रोजी नवीन अर्ज भरावा लागणार आहे.



अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागा


राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २० लाख ४३ हजार २५४ जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यात विज्ञान शाखेच्या ८ लाख ५२ हजार २०६ जागा , वाणिज्य शाखेच्या ५ लाख ४० हजार ३१२ जागा, कला शाखेच्या ६ लाख ५० हजार ६८२ जागा आहेत.

सर्वाधिक जागा मुंबई विभागात ४ लाख ६१ हजार ६४०, त्या खालोखाल जागा पुणे विभागात ३ लाख ७५ हजार ४८६, छत्रपती संभाजीनगर विभागात २ लाख ६६ हजार ७५० जागा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला