11th admission: अकरावी प्रवेशासाठी पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यभर अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया लागू केली आहे. त्यासाठी राज्यभरातील ९,२९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ ते २८ मेदरम्यान खुली राहणार आहे.

पहिल्या फेरीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना शंभर रुपये शुल्क भरावे लागेल आणि एक ते दहा प्राधान्यक्रम निवडता येतील. तात्पुरती गुणवत्ता यादी ३० मे रोजी, अंतिम यादी ३ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते १२ जूनदरम्यान प्रवेश घ्यावा लागेल.

या प्रक्रियेसाठी https://mahafyjcadmissions.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध असून, २० लाखांहून अधिक जागा विविध शाखांसाठी आहेत. राखीव कोट्यांसाठीही अर्ज करता येणार असून, त्यावर प्रवेश ५ जूनपासून सुरू होतील.

विद्यार्थ्यांसाठी १९ व २० मे रोजी अर्ज भरण्याचा सराव ठेवण्यात येणार असून २० मेच्या रात्री संकेतस्थळावरून तो अर्ज हटवण्यात येईल व २१ मे रोजी नवीन अर्ज भरावा लागणार आहे.



अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागा


राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २० लाख ४३ हजार २५४ जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यात विज्ञान शाखेच्या ८ लाख ५२ हजार २०६ जागा , वाणिज्य शाखेच्या ५ लाख ४० हजार ३१२ जागा, कला शाखेच्या ६ लाख ५० हजार ६८२ जागा आहेत.

सर्वाधिक जागा मुंबई विभागात ४ लाख ६१ हजार ६४०, त्या खालोखाल जागा पुणे विभागात ३ लाख ७५ हजार ४८६, छत्रपती संभाजीनगर विभागात २ लाख ६६ हजार ७५० जागा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात