11th admission: अकरावी प्रवेशासाठी पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यभर अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया लागू केली आहे. त्यासाठी राज्यभरातील ९,२९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ ते २८ मेदरम्यान खुली राहणार आहे.

पहिल्या फेरीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना शंभर रुपये शुल्क भरावे लागेल आणि एक ते दहा प्राधान्यक्रम निवडता येतील. तात्पुरती गुणवत्ता यादी ३० मे रोजी, अंतिम यादी ३ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते १२ जूनदरम्यान प्रवेश घ्यावा लागेल.

या प्रक्रियेसाठी https://mahafyjcadmissions.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध असून, २० लाखांहून अधिक जागा विविध शाखांसाठी आहेत. राखीव कोट्यांसाठीही अर्ज करता येणार असून, त्यावर प्रवेश ५ जूनपासून सुरू होतील.

विद्यार्थ्यांसाठी १९ व २० मे रोजी अर्ज भरण्याचा सराव ठेवण्यात येणार असून २० मेच्या रात्री संकेतस्थळावरून तो अर्ज हटवण्यात येईल व २१ मे रोजी नवीन अर्ज भरावा लागणार आहे.



अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागा


राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २० लाख ४३ हजार २५४ जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यात विज्ञान शाखेच्या ८ लाख ५२ हजार २०६ जागा , वाणिज्य शाखेच्या ५ लाख ४० हजार ३१२ जागा, कला शाखेच्या ६ लाख ५० हजार ६८२ जागा आहेत.

सर्वाधिक जागा मुंबई विभागात ४ लाख ६१ हजार ६४०, त्या खालोखाल जागा पुणे विभागात ३ लाख ७५ हजार ४८६, छत्रपती संभाजीनगर विभागात २ लाख ६६ हजार ७५० जागा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध