Rain Radar : आता अतिवृष्टीचा अंदाज पाच तास आधी मिळणार!

मुंबईत २६ जुलै २००५ ची अतिवृष्टीची रात्र आठवली की काळजाचा ठोका चुकतो. या दिवशी प्रचंड पाऊस झाल्यानं मुंबई शहर पाण्याखाली गेलं होतं. मुंबईत या आधी आणि नंतरही अनेक अतिवृष्टीच्या घटना घडल्या. मात्र २००५ मधली अतिवृष्टीवेळी मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि मृत्यूचे तांडव मुंबईकरांनी पाहिले. हे भयंकर होतं. त्यामुळं संपूर्ण शहर जलमय झालं होतं. यात १५०० नागरिकांचा बळी गेला. अतिवृष्टीचा हवामान विभागाकडून अंदाज लवकर मिळाला तर प्रशासनाला वेळीच उपाय करता येणं शक्य होतं. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवून किंवा अलर्ट करून जीवित हानी टाळता येऊ शकते. हेच आता रडारमुळं शक्य होणार आहे. कारण मुंबई जलमय होण्याच्या किमान पाच ते सहा तास आधी अतिवृष्टीचा अंदाज आपल्याला मिळू शकणार आहे.



मुंबई, पुणे तसेच कोकण भागात होणाऱ्या अतिवृष्टीचा अंदाज येण्यास अनेक अडचणी होत्या. त्या यंदाच्या मान्सून हंगामापासून कमी होण्याची शक्यता आहे. कारण सप्टेंबर २०२४ मध्ये मुंबईतील पनवेल, वसई-विरार, विलेपार्ले आणि कल्याण- डोंबिवली या भागात चार एक्स बॅन्ड रडार बसवले आहेत. ही सर्व रडार मुंबई जलमय होण्याच्या किमान पाच ते सहा तास आधी हा अंदाज देऊ शकतील. काही प्रमाणात पुणे आणि कोकणातील काही भाग हे या रडारच्या कक्षेत असतील. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) मुंबईत एक्स- बँड रडार नेटवर्क स्थापित केली आहेत. त्यामुळं जोरदार पावसाचा अंदाज लवकर मिळण्याची सोय झाली आहे. मुंबईतील १३८ स्टेशनवरचा पाऊस हे रडार नोंदवतील. त्याचा फायदा पुणे शहरासह कोकण विभागाला काही प्रमाणात होईल, असं सांगितलं जातय.



कुठे आहेत हे चार रडार?



  • पनवेल

  • वसई- विरार

  • विलेपार्ले

  • कल्याण- डोंबिवली



कसे काम करणार?


प्रत्येक रडारमधील डेटा एकत्रित केला जाईल, ज्यामुळं मुंबईतील हवामान प्रणालींचा रिअल-टाइम ट्रॅकिंग होईल. मुंबईच्या हवामानाचे बदल आणि त्याचं सततचे रिडिंग मिळेल. रडार नेटवर्क असलेल्या भागात पावसाचं निरीक्षण करेल. त्यानुसार अतिवृष्टीचा अंदाज देणं सोप होणार आहे. मुसळधार पाऊस, वादळ, विजांचा कडकडाट कधी होईल हेही समजण्यास सोपे होईल.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'