जगाला भारताची दहशतवाद विरोधी भूमिका सांगणार ५९ जणांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील एकूण नऊ अतिरेक्यांचे तळ तसेच अतिरेक्यांचे लाँच पॅड नष्ट केले. यानंतर भारताने दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे देश यांना शत्रू समजणार आणि त्यांच्या विरोधात कारवाई करणार असे जाहीर केले. दहशतवादाचा बीमोड करेपर्यंत कारवाई सुरू राहील असेही भारताने जाहीर केले. हीच भारताची दहशतवादाच्या विरोधातील भूमिका समजावून सांगण्यासाठी केंद्र सरकारने एकूण सात राजकीय शिष्टमंडळं स्थापन केली आहेत. ही मंडळं जगातील विविध देशांचा दौरा करुन भारताची दहशतवाद विरोधी भूमिका तिथल्या नेतृत्वाला समजावून सांगणार आहेत.



पाकिस्तानने अतिरेक्यांवर झालेली कारवाई ही पाकिस्तान विरोधात झालेली कारवाई आहे; असा समज करुन घेऊन भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. तसेच भारताच्या सैन्य तळांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यानंतर भारताने पाकिस्तानच्या निवडक सैन्य तळांना लक्ष्य करुन प्रतिहल्ला केला. भारताच्या कारवाईचा धसका घेऊन पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव सादर केला. भारताने प्रस्ताव स्वीकारत शस्त्रसंधी स्वीकारली. पण पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला अथवा दहशतवादी आणि दहशतवाद्यांच्या कारवायांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला तर भारत कारवाई करेल, असे केंद्र सरकारने जाहीर केले. यानंतर भारताने जगभर राजकीय शिष्टमंडळं पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

भारतात दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे देश या सर्वांच्या विरोधात कारवाई करणार, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. देशाच्या याच भूमिकेची माहिती जगातील सर्व प्रमुख देशांना दिली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने जगातील प्रमुख देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूण सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं जगातील वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहे. यापैकी मुख्य शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेस खासदार शशी थरुर करणार आहेत. हे शिष्टमंडळ अमेरिकेत जाणार आहे.

भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, जनता दल युनायटेडचे संजय कुमार झा, द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे सर्व खासदार वेगवेगळ्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार आहेत. प्रत्येक शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेट देऊन भारत सरकारची दहशतवादाविरुद्धची भूमिका समजावून सांगणार आहे. विविध पक्षांचे खासदार आणि माजी मंत्री आणि ८ माजी राजदूतांसह एकूण ५९ राजकीय नेत्यांचा सहभाग असलेली अशी सात राजकीय शिष्टमंडळं तयार करण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली.

भाजपाच्या बैजयंत पांडांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहरिन, अल्जेरियाच्या सरकारशी संवाद साधणार आहे. भाजपाच्याच रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि डेन्मार्कच्या सरकारशी तसेच युरोपियन युनियनशी संवाद साधणार आहे. जनता दल युनायटेडच्या संजय कुमार झा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, प्रजासत्ताक कोरिया, जपान, सिंगापूरच्या सरकारशी संवाद साधणार आहे. शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ यूएई, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओनीच्या सरकारशी संवाद साधणार आहे.

काँग्रेसच्या शशी थरुर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ अमेरिका, पनामा, गुयाना, ब्राझिल, कोलंबियाच्या सरकारशी संवाद साधणार आहे. द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लॅटविया आणि रशियाच्या सरकारशी संवाद साधणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इजिप्त, कतार, इथिओपिया, दक्षिण आफ्रिकेच्या सरकारशी संवाद साधणार आहे.
Comments
Add Comment

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा