आमदार अमित देशमुखांच्या साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित लवादाकडून कोट्यवधींचा दंड

नांदेड : काँग्रेस आमदार अमित देशमुख यांना राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठाने दणका दिला आहे. देशमुखांच्या मालकीच्या साखर कारखान्यातून राख आणि दूषित पाणी शेतांमध्ये सोडले जाते. यामुळे शेतीचे नुकसान होत असल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला.

नांदेड जिल्ह्यातील शिवणी जामगा येथे २१ शुगर फॅक्टरी युनिट नंबर ३ कार्यरत आहे. हा साखर कारखाना काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यातून निघणारी राख आणि दूषित पाणी शेतात सोडल्यामुळे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. मनोहर धोंडगे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०२३ रोजी हरित लवादाकडे याचिका केली. याचिकेवर ३० एप्रिल २०२५ रोजी निर्णय आला. या निकालाची माहिती प्रा. मनोहर धोंडगे यांनी निकालपत्र हाती आल्यावर प्रसारमध्यमांना दिली.

राष्ट्रीय हरित लवादाने अमित देशमुखांच्या साखर कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ३१ शेतकऱ्यांना ५४ लाख ४३ हजार ९५५ रुपयाचा निधी नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले.
Comments
Add Comment

जमीन घोटाळा चौकशीसाठी अजित पवारांचा राजीनामा घ्या; अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना जमीन घोटाळ्याची चौकशी नीट होऊ शकेल का? असा सवाल करून मुख्यमंत्री

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! "कोणी 'माईचा लाल' आला तरी...योजनेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा सडेतोड इशारा

मुंबई : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) महिला

शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा टळली, मिळाली थेट पुढील वर्षाची 'डेट'

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावरच 'अपात्रते'वर फैसला होण्याची शक्यता नवी दिल्ली

भुसावळ-महानगरी एक्सप्रेसमध्ये पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआयचे संदेश

महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी

Amravati News : थरकाप उडवणारा व्हिडिओ! लग्नसोहळ्यात स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार; नवरी जागीच बेशुद्ध

अमरावती : लग्न समारंभ म्हटला की, आनंद, जल्लोष आणि आयुष्यभराच्या नव्या सुरुवातीचे वातावरण असते. मात्र, अमरावती (Amravati

पंढरपूरच्या विठुरायाला भरली हुडहुडी! होळीपर्यंत असतो विठुरायाच्या हा खास पोषक

पंढरपूर : सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढत चालला आहे. आणि तापमानाचा पारा गोठत चालला आहे त्यामुळे साक्षात