आमदार अमित देशमुखांच्या साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित लवादाकडून कोट्यवधींचा दंड

  81

नांदेड : काँग्रेस आमदार अमित देशमुख यांना राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठाने दणका दिला आहे. देशमुखांच्या मालकीच्या साखर कारखान्यातून राख आणि दूषित पाणी शेतांमध्ये सोडले जाते. यामुळे शेतीचे नुकसान होत असल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला.

नांदेड जिल्ह्यातील शिवणी जामगा येथे २१ शुगर फॅक्टरी युनिट नंबर ३ कार्यरत आहे. हा साखर कारखाना काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यातून निघणारी राख आणि दूषित पाणी शेतात सोडल्यामुळे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. मनोहर धोंडगे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०२३ रोजी हरित लवादाकडे याचिका केली. याचिकेवर ३० एप्रिल २०२५ रोजी निर्णय आला. या निकालाची माहिती प्रा. मनोहर धोंडगे यांनी निकालपत्र हाती आल्यावर प्रसारमध्यमांना दिली.

राष्ट्रीय हरित लवादाने अमित देशमुखांच्या साखर कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ३१ शेतकऱ्यांना ५४ लाख ४३ हजार ९५५ रुपयाचा निधी नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले.
Comments
Add Comment

​Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर​ चार महिन्यांत ११ बळी!

मुंबई- पुणे या सहा पदरी महामार्गावरील आजघडीला दररोज लाखो वाहने धावतात. यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्ग म्हणून

Pune News : बकरी ईद निमित्त पुण्यातील ‘हे’ रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते वाचा

पुणे : मुस्लिम बांधवांसाठी बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. देशभरात ७ जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली

Rajgad Fort : पतीसह गेली राजगड फिरायला; पाय घसरला अन् थेट १५० फूट दरीत कोसळली

पुणे : पुण्यातील राजगडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावसाळा सुरु होताच अनेकांनी गाद किल्ले फिरायला सुरुवात केली

राज ठाकरे लागले कामाला, पक्षात मोठे फेरबदल, ९ जूनला ठाकरेंचा दौरा

पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यात

काजव्यांच्या चकाकण्याचा करिष्मा बघण्यासाठी अभयारण्यात गर्दी

अकोले : काजव्यांची मायानगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदर्‍याच्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात

विद्यापीठांच्या निधी प्रस्तावांना मंजुरी नाही : कृषिमंत्र्यांची तंबी

राहुरी : राज्यातील कृषी विद्यापीठांनी निधी मागणीचे प्रस्ताव सादर करताना आधी गरज स्पष्ट करावी. बांधकाम किंवा