आमदार अमित देशमुखांच्या साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित लवादाकडून कोट्यवधींचा दंड

  104

नांदेड : काँग्रेस आमदार अमित देशमुख यांना राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठाने दणका दिला आहे. देशमुखांच्या मालकीच्या साखर कारखान्यातून राख आणि दूषित पाणी शेतांमध्ये सोडले जाते. यामुळे शेतीचे नुकसान होत असल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला.

नांदेड जिल्ह्यातील शिवणी जामगा येथे २१ शुगर फॅक्टरी युनिट नंबर ३ कार्यरत आहे. हा साखर कारखाना काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यातून निघणारी राख आणि दूषित पाणी शेतात सोडल्यामुळे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. मनोहर धोंडगे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०२३ रोजी हरित लवादाकडे याचिका केली. याचिकेवर ३० एप्रिल २०२५ रोजी निर्णय आला. या निकालाची माहिती प्रा. मनोहर धोंडगे यांनी निकालपत्र हाती आल्यावर प्रसारमध्यमांना दिली.

राष्ट्रीय हरित लवादाने अमित देशमुखांच्या साखर कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ३१ शेतकऱ्यांना ५४ लाख ४३ हजार ९५५ रुपयाचा निधी नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले.
Comments
Add Comment

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

विधवा पेन्शन योजनेची रक्कम ५००० रुपये करा

खासदार रविंद्र वायकर यांनी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे व सचिव यांना पाठवले पत्र मुंबई : राज्यातील