रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीतील लासा कंपनीला रविवार १८ मे रोजी आग लागली. आग लागण्याचे कारण समजलेले नाही. पण कंपनीतून आकाशाच्या दिशेने जात असलेले धुराचे लोट लांबूनही स्पष्ट दिसत आहेत. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अग्निशमन दलाचे पथक आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. याआधी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला शनिवारी रात्री उशिरा आग लागली. ही आग रविवारी पण धूमसत होती. या दुर्घटनेत तीन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. बेपत्ता असलेल्या चौघांचा शोध सुरू आहे.