Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार करून १५ जून २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोकण रेल्वेवर विशेष मान्सून वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मुंबई-गोवा मार्गावरील अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा पत्रकात बदल होणार आहे.या बदलाचा फटका कोकणकन्या एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेस यांसारख्या लोकप्रिय गाड्यांना बसणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वेळापत्रक तपासणे अत्यावश्यक ठरणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा; दोन दिवसांत जागावाटप अंतिम करणार मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान ...
मुसळधार पाऊस, रुळांवर पाणी साचणे, झाडे पडणे आणि दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे रेल्वे प्रशासन दरवर्षी मान्सूनवेळी रेल्वेच्या वेळपत्रकात बदल करते. यावेळीही वेळपत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे काही गाड्या उशिराने धावतीलकोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, 15 जून ते 20 ऑक्टोबरदरम्यान मूळ स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांनाच हे वेळापत्रक लागू असेल. विविध गाड्यांच्या सुधारित वेळांची माहिती स्वतंत्र परिशिष्टाद्वारे जाहीर केली जाणार आहे. ती स्थानकांवरील सूचना फलक, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली आणि अधिकृत माध्यमांतून उपलब्ध करून दिली जाईल.दरम्यान, मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांची कामे सुरू आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या सध्या 3 ते 4 तास उशिराने धावत आहेत. तसेच मुंबईतील सीएसएमटी आणि एलटीटी स्थानकांवरील काही गाड्यांचे लास्ट स्टेशनही बदलण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अपडेट्स तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





