अकरावी प्रवेशासाठी ऑफलाइन प्रणालीची मागणी

वाडा : पालघर जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी इंटरनेट अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शिक्षण संचालनालयामार्फत अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आलेली असली, तरी जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये अद्यापही सुसज्ज इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता, खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी माननीय मुख्यमंत्री व माननीय शिक्षणमंत्री यांना याबाबत ईमेलद्वारे पत्र व्यवहार करत सविस्तर मागणी केली आहे.


दुर्गम व आर्थिकदृष्ट्या मागास भागांतील अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोनची सुविधा नसल्यामुळे ते ऑनलाइन फॉर्म भरू शकत नाहीत. परिणामी, त्यांची अकरावी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता असून, त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात येऊ शकते. या पार्श्वभूमीवर, पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी खासदार डॉ. सवरा यांनी केली आहे. ऑफलाइन प्रणालीच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सुलभ होईल आणि त्यांचे शिक्षण खंडित होणार नाही.

Comments
Add Comment

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही