अकरावी प्रवेशासाठी ऑफलाइन प्रणालीची मागणी

वाडा : पालघर जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी इंटरनेट अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शिक्षण संचालनालयामार्फत अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आलेली असली, तरी जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये अद्यापही सुसज्ज इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता, खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी माननीय मुख्यमंत्री व माननीय शिक्षणमंत्री यांना याबाबत ईमेलद्वारे पत्र व्यवहार करत सविस्तर मागणी केली आहे.


दुर्गम व आर्थिकदृष्ट्या मागास भागांतील अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोनची सुविधा नसल्यामुळे ते ऑनलाइन फॉर्म भरू शकत नाहीत. परिणामी, त्यांची अकरावी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता असून, त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात येऊ शकते. या पार्श्वभूमीवर, पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी खासदार डॉ. सवरा यांनी केली आहे. ऑफलाइन प्रणालीच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सुलभ होईल आणि त्यांचे शिक्षण खंडित होणार नाही.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील