Pune News: उजनी धरणाकाठच्या रहिवाशांना भयंकर आजाराचा धोका! दूषित पाण्यामुळे कॅन्सर, त्वचारोगाची शक्यता

पुणे: सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत आहे, पुण्यात सुद्धा ऐन मे महिन्याच्या गरमीत अवकाळीने हजेरी लावली आहे.याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हयातील उजनी धरणातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पावसाच्या पाण्याबरोबरच पुण्यातील विविध रासायनिक कंपन्यांमधून निघणाऱ्या रासायनिक व प्रदूषित पाण्याने उजनी धरणातील पाणी प्रदूषित होत असल्याचा दावा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केला आहे.


पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वासहतीतील कारखाने, साखर कारखाने लाखों लीटर रसायनमिश्रित सांडपाणी सातत्याने भीमा नदीत सोडले जात आहेत. त्यामुळे उजनी जलाशयातील मासे व इतर जलचर प्राण्यांना तसेच लाखों नागरिकांना या प्रदूषणामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. जलाशयाला जलपर्णीचा विळखा पडत आहे. या गंभीर बाबीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. तब्बल 117 टीएमसी क्षमता असणाऱ्या उजनी धरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतून येणारे 20 टीएमसी पाणी संपूर्ण धरणाला विषारी बनवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे लाखो नागरिकांना दुर्धर आजार झाल्याचा गंभीर आरोप जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा (Rajendra Singh Rana) यांनी केला आहे.



पुणे महापालिकेतील पाण्यामुळे धरण प्रदूषित



उजनी धरण (Ujani Dam) परिसरात पाहणी केल्यानंतर त्यांनी सरकारवर ताशेरे ओढत या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. उजनी धरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील उद्योग आणि महापालिकांचे जवळपास 20 पीएमसी विषारी पाणी मिसळत असल्याने यामुळे धरणातील सर्व 117 टीएमसी पाणी विषारी बनत आहे. या विषारी पाण्यामुळे धरणाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या लाखो नागरिकांना याचा फटका बसत असून अनेकांना कॅन्सर आणि त्वचारोगासारखे दुर्धर आजार उद्भवू लागले आहेत. अशावेळी शासनाने याकडे गांभीर्याने पाहून सर्वांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केले आहे. (Ujani pollution scary for health)


राजेंद्र सिंह यांनी उजनी धरण परिसरात फिरून पाहणी केल्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. यावर्षी 110 टक्के भरलेले उजनी धरण आता मोकळे होऊ लागले आहे. या ठिकाणी जमिनीवर जे पांढऱ्या रंगाचे आवरण दिसत आहे. ते सर्व उद्योगातून येणाऱ्या विषारी रसायनाचे असल्याचा दावा राणा यांनी केला आहे. अशावेळी विकासाच्या गोष्टी करताना पुणे आणि पिंपरी चिंचवड याला एक न्याय व उजनी धरणाखाली असलेल्या शहरांना दुसरा न्याय असे करणे योग्य आहे का असाही सवाल त्यांनी केला आहे.

Comments
Add Comment

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत