शाळांना जिओ टॅगिंग करणे बंधनकारक

रत्नागिरी : शासनाने राज्यातील सर्व शाळांना जिओ टॅगिंग बंधनकारक केले आहे. तसे पत्र शिक्षण आयुक्त सचिन्द्र सिंह यांनी काढले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील सर्व शाळांना जिओ टॅगिंग करावे लागणार आहे.


महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रांसह टॅग करून माहिती भरण्यासाठी महा स्कूल जीआयएस अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपवर माहिती भरावी लागणार आहे.


शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्याने फोटो अपलोड करताना अनेक अडचणी येत आहेत. राज्यात काही ठिकाणी कागदोपत्री शाळा असल्याचे बोलले जाते. एकही विद्यार्थी, शाळेसाठी इमारत नसतानाही केवळ कागदोपत्री शाळा चालवल्या जात असल्याची चर्चा नेहमीच शिक्षण विभागात असते. या सगळ्या गोष्टींना आता आळा बसणार आहे.

Comments
Add Comment

कोकणच्या लाल मातीला लागली शिमगोत्सवाची चाहूल

ग्रामदैवतांच्या पालख्या, पारंपरिक नृत्यप्रकार, दशावतारी नाट्यप्रयोगांची तयारी अंतिम टप्प्यात रत्नागिरी :

संगमेश्वर तालुक्यात तीन जि. प. गटांत होणार हायहोल्टेज लढती

साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिष्ठा पणाला नीलेश जाधव देवरूख : जिल्हा परिषद व पंचायत

सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड यांच्यावतीने ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी परीक्षा

गुहागरात युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार

आशिष कारेकर गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत

अपघातात जखमींना मिळणार कॅशलेस उपचार

प्राण वाचवणाऱ्या मदतनीसालाही २५ हजार रुपये रोख बक्षीस रत्नागिरी : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे