शाळांना जिओ टॅगिंग करणे बंधनकारक

रत्नागिरी : शासनाने राज्यातील सर्व शाळांना जिओ टॅगिंग बंधनकारक केले आहे. तसे पत्र शिक्षण आयुक्त सचिन्द्र सिंह यांनी काढले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील सर्व शाळांना जिओ टॅगिंग करावे लागणार आहे.


महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रांसह टॅग करून माहिती भरण्यासाठी महा स्कूल जीआयएस अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपवर माहिती भरावी लागणार आहे.


शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्याने फोटो अपलोड करताना अनेक अडचणी येत आहेत. राज्यात काही ठिकाणी कागदोपत्री शाळा असल्याचे बोलले जाते. एकही विद्यार्थी, शाळेसाठी इमारत नसतानाही केवळ कागदोपत्री शाळा चालवल्या जात असल्याची चर्चा नेहमीच शिक्षण विभागात असते. या सगळ्या गोष्टींना आता आळा बसणार आहे.

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा; अन्यथा.....

मुंबई : मुंबईतील कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा पूर्ववत सुरू

'कोकण रेल्वेच्या गाड्यांना दिवा ऐवजी दादरचाच थांबा द्यावा'

खेड : रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला मागील काही महिन्यांपासून दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्यात आला आहे.

‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला.

कोकणच्या विकासासाठी निधीचा धडाका; गॅस तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका - गृहमंत्री योगेश कदम

रत्नागिरी : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत कोकणचा विकास, गॅस पुरवठा आणि राजकीय

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक