Ind VS Pak : भारत-पाक युद्धाचा मनोरंजन विश्वावर काय झाला परिणाम?

  52

भारत - पाकिस्तान युद्धाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांवरच परिणाम झाला नाही तर मनोरंजन क्षेत्रही भरडलं गेलंय. अनेक सिनेमांचं प्रदर्शन रद्द झालंय. कलाकारांचे दौरे पुढे ढकलले गेलेत. भारत - पाकिस्तान युद्धाचा नेमका काय परिणाम झाला आहे ते जाणून घेऊया.


पहलगाम दहशतवाही हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमेद्वारे घेतला. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारताविरुद्ध कुरापतींना सुरुवात केली. याचा फटका मनोरंजन क्षेत्र आणि विमान सेवांना बसला. कलाकार आणि चित्रपट प्रदर्शनावरही भारत - पाक तणावाचे परिणाम जाणवले. कोट्यवधींची उलाढाल थांबलीय.


?si=CzXL-jXqxxIYm-KB

कमल हसन यांच्या ठग लाईफ या चित्रपटाचा ऑडिओ लॉन्च १६ मे रोजी होणार होता तर राजकुमार राव आणि वामिका गब्बीचा भूल चकू माफ सिनेमा ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. कमल हसन यांचा ठग लाईफ हा ऑडिओ लॉन्च चेन्नईच्या इनडोअर स्टेडिययमध्ये होणार होता, मात्र देशासाठी जवान सीमेवर लढत असताना असा इव्हेंट करणं योग्य नसल्याचे सांगत तो रद्द करण्यात आला. तर भूल चूक माफ हा सिनेमा आता १६ मे रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे.



भारत - पाकिस्तान तणाव वाढल्याने फवाद खानच्या अबीर गुलाल या चित्रपटाचंही प्रदर्शन लांबवण्यात आलंय. तर दुसरीकडे गायिका उषा उत्थुप यांचा कॉन्सर्ट रद्द करण्यात आलाय.पहलगाम हल्ल्यानंतर अरिजीत सिंगचा कॉन्सर्टही रद्द करण्यात आलाय. हा शो चेन्नईत होणार होता. त्याचबरोबर अबूधाबीमध्ये होणारा इव्हेंटही रद्द करण्यात आलाय. एकूणच भारत - पाकिस्तान युद्धाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसलाय. आता युद्धविराम झालाय. त्यामुळे काही दिवसांनी या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल, एवढं निश्चित.

Comments
Add Comment

Shefali Jariwala Passes Away: 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवालाचे हृदयविकाराने निधन

Shefali Jariwala Passes Away due to Cardiac Arrest: 'कांटा लगा' या गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि नृत्यांगना शेफाली जरीवालाचे निधन झाले

विजय देवरकोंडावर होणार पोलीस कारवाई ?

  दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा नेहमीच त्याच्या अनोख्या अंदाजामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेच्या

रश्मिकाच्या या लूकने प्रेक्षक घाबरले; श्रीवल्लीचा उग्र अवतार पाहिला का ?

अभिनेत्री रश्मिका मंदाना कायमच निरनिराळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येऊन त्यांची मन जिंकते. नॅशनल क्रश असणारी

सावरकरांचं ‘संगीत संन्यस्त खड्ग’ पुन्हा रंगमंचावर

मुंबई :'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने नव्या स्वरूपात रंगमंचावर येणार आहे.या

दादरमध्ये सुरांच्या रूपात अवतरणार पंढरपूर

मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वारीच्या निमित्ताने भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. देवाला आळविण्याचा

'त्या गे व्यक्तीने मला नको तिथे स्पर्श केला...', अभिषेक कुमारचा धक्कादायक अनुभव

मुंबई: 'बिग बॉस १७' मुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिषेक कुमारने (Abhishek Kumar) नुकताच कास्टिंग काऊचचा एक धक्कादायक