Ind VS Pak : भारत-पाक युद्धाचा मनोरंजन विश्वावर काय झाला परिणाम?

भारत - पाकिस्तान युद्धाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांवरच परिणाम झाला नाही तर मनोरंजन क्षेत्रही भरडलं गेलंय. अनेक सिनेमांचं प्रदर्शन रद्द झालंय. कलाकारांचे दौरे पुढे ढकलले गेलेत. भारत - पाकिस्तान युद्धाचा नेमका काय परिणाम झाला आहे ते जाणून घेऊया.


पहलगाम दहशतवाही हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमेद्वारे घेतला. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारताविरुद्ध कुरापतींना सुरुवात केली. याचा फटका मनोरंजन क्षेत्र आणि विमान सेवांना बसला. कलाकार आणि चित्रपट प्रदर्शनावरही भारत - पाक तणावाचे परिणाम जाणवले. कोट्यवधींची उलाढाल थांबलीय.


?si=CzXL-jXqxxIYm-KB

कमल हसन यांच्या ठग लाईफ या चित्रपटाचा ऑडिओ लॉन्च १६ मे रोजी होणार होता तर राजकुमार राव आणि वामिका गब्बीचा भूल चकू माफ सिनेमा ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. कमल हसन यांचा ठग लाईफ हा ऑडिओ लॉन्च चेन्नईच्या इनडोअर स्टेडिययमध्ये होणार होता, मात्र देशासाठी जवान सीमेवर लढत असताना असा इव्हेंट करणं योग्य नसल्याचे सांगत तो रद्द करण्यात आला. तर भूल चूक माफ हा सिनेमा आता १६ मे रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे.



भारत - पाकिस्तान तणाव वाढल्याने फवाद खानच्या अबीर गुलाल या चित्रपटाचंही प्रदर्शन लांबवण्यात आलंय. तर दुसरीकडे गायिका उषा उत्थुप यांचा कॉन्सर्ट रद्द करण्यात आलाय.पहलगाम हल्ल्यानंतर अरिजीत सिंगचा कॉन्सर्टही रद्द करण्यात आलाय. हा शो चेन्नईत होणार होता. त्याचबरोबर अबूधाबीमध्ये होणारा इव्हेंटही रद्द करण्यात आलाय. एकूणच भारत - पाकिस्तान युद्धाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसलाय. आता युद्धविराम झालाय. त्यामुळे काही दिवसांनी या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल, एवढं निश्चित.

Comments
Add Comment

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार मुंबई: हिंदीमधील अजरामर

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित