पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांवर मेहरबान! छावण्या पुन्हा बांधणार, मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबाला कोटीची मदत करणार

  55

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने नष्ट केलेल्या दहशतवादी तळाचे पुनर्वसन करण्याची घोषणा पाकिस्तान शाहबाज शरीफ सरकारने केली असून, हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शहीद मानून त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी १ कोटी रुपये, जखमींना १० ते २० लाख रुपये आर्थिक मदत केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर यांच्या कुटुंबातील १४ जण ठार झाले होते, त्यानुसार त्याच्या कुटुंबियांना १४ कोटी पाकिस्तानी रुपये दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांना 'शहीद' घोषित करून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा वर्षाव करणे, आणि त्यांची अड्डे पुन्हा उभारणे, हे आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे.



शाहबाज शरीफ सरकारचा दहशतवाद्यांना मदतीचा हात


शाहबाज शरीफ सरकार ज्या पद्धतीने दहशतवाद्यांच्या कुटुंबांना मेहरबान झालं आहे, त्यातून हे स्पष्ट होते की पाकिस्तान अजूनही दहशतवादाला गोंजारत आहे.



भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत  ७ मे च्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या संघटनांच्या छावण्या यादरम्यान उद्ध्वस्त करण्यात आल्या.  या दहशतवादी अड्ड्यांमध्ये भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती.



मसूद अझहरच्या कुटुंबियांना 14 कोटींची मदत


ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 दहशतवादी मारले गेले आहेत, त्यामुळे पाकिस्तान सरकार त्याच्या कुटुंबाला 14 कोटी रुपये भरपाई म्हणून देणार आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी घरे बांधणे आणि त्यांच्या मुलांची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार ही जबाबदारी पार पाडेल, असे पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुक्ताफळं उधळली आहेत.


या घोषणेमुळे शांतता आणि दहशतवादविरोधी लढ्याचे ढोंग करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो अजूनही दहशतवाद्यांचा हात धरून आहे.



प्राण गमावलेल्या पाक लष्कराच्या जवानांना आर्थिक मदत


शाहबाज शरीफ सरकार प्राण गमावलेल्या पाक लष्कराच्या जवानांना 1ते 1.8 कोटी पाकिस्तानी रुपयांची भरपाई देणार आहे. सैनिकांच्या कुटुंबियांना त्यांच्या पदानुसार ही भरपाई दिली जाईल आणि त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत पूर्ण वेतन आणि निर्वाह भत्ता दिला जाईल. तसेच पाक सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल आणि प्रत्येक सैनिकाच्या एका मुलीच्या लग्नासाठी 10 लाख पाकिस्तानी रुपये आर्थिक मदत म्हणून देईल. तर जखमी सैनिकांना 20 ते 50 लाख पाकिस्तानी रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. ज्या सैनिकांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरांसाठी 1.9 ते 4.2 कोटी रुपये दिले जातील.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.