कोकणातील सुरक्षित किनाऱ्यांचे कासवांना आकर्षण

  30

बहुसंख्य माद्यांचा समुद्र किनारी मुक्काम


रत्नागिरी : गेल्या दोन वर्षात दापोली, गुहागर, राजापूर आणि रत्नागिरी या तालुक्यांमधील सागर किनाऱ्यांवर कासवे मोठ्या प्रमाणावर येऊन मुक्काम करू लागली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात येथील किनाऱ्यांवर कासवांची घरटी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहेत. कोकणातील सुरक्षित समुद्र किनाऱ्यांमुळेच कासवांची पावले या ठिकाणी वळली असावीत.


ओडिशा येथे साधारणपणे १९७० च्या सुमारास कासवांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. यातूनच कासवांना फ्लिपर मेटल टॅग लावण्यात आले. आतापर्यंत ओडिशामध्ये टॅग केलेल्या कासवांपैकी बहुसंख्य कासव तामिळनाडूच्या गल्फ ऑफ मन्नारपर्यंत आणि श्रीलंकेपर्यंत गेली आहेत. यातील बहुसंख्य माद्या त्याच भागात परत अंडी घालण्यासाठी आल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे.



वनविभाग, कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रथमच महाराष्ट्रात सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास करण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये गुहागर येथे सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवलेली ‘बागेश्री’ सात महिन्यात अरबी समुद्रातून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, कन्याकुमारी ते श्रीलंकेपर्यंत पाच हजार किलोमीटर फिरल्याची नोंद आहे. २७ जानेवारी २०२५ रोजी गुहागर येथे नेमलेल्या कासव मित्रांना एका मादीला ०३२३३ क्रमांकाचा लावलेला फ्लिपर टॅग आढळला. तपासाअंती या मादीला १८ मार्च २०२१ रोजी ओडिशा येथे फ्लिपर टॅग केल्याची नोंद आढळली. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची ही मादी गुहागर समुद्रकिनारी सुमारे ३५०० किलोमीटर प्रवास करून अंडी घालण्यासाठी आली होती. या वर्षीही रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मिळून ६४ माद्यांना टॅगिंग करण्यात आले आहे.


कासवांचा स्थलांतर पॅटर्न, अधिवासाची निवड, खाद्याची उपलब्धता, वातावरणातील बदल, जागतिक तापमान वाढ आणि अंडी घालण्यासाठी सुरक्षित ठिकाणे आदी अनेक घटक याला कारणीभूत असू शकतात, अशा अनेक बाबी कासवांच्या स्थलांतराविषयी अभ्यासकांकडून नोंदविण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण

मुंबई-गोवा महामार्ग कामात दिरंगाई व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही

खासदार नारायण राणे यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ठेकेदार गांभीर्याने