कोकणातील सुरक्षित किनाऱ्यांचे कासवांना आकर्षण

बहुसंख्य माद्यांचा समुद्र किनारी मुक्काम


रत्नागिरी : गेल्या दोन वर्षात दापोली, गुहागर, राजापूर आणि रत्नागिरी या तालुक्यांमधील सागर किनाऱ्यांवर कासवे मोठ्या प्रमाणावर येऊन मुक्काम करू लागली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात येथील किनाऱ्यांवर कासवांची घरटी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहेत. कोकणातील सुरक्षित समुद्र किनाऱ्यांमुळेच कासवांची पावले या ठिकाणी वळली असावीत.


ओडिशा येथे साधारणपणे १९७० च्या सुमारास कासवांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. यातूनच कासवांना फ्लिपर मेटल टॅग लावण्यात आले. आतापर्यंत ओडिशामध्ये टॅग केलेल्या कासवांपैकी बहुसंख्य कासव तामिळनाडूच्या गल्फ ऑफ मन्नारपर्यंत आणि श्रीलंकेपर्यंत गेली आहेत. यातील बहुसंख्य माद्या त्याच भागात परत अंडी घालण्यासाठी आल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे.



वनविभाग, कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रथमच महाराष्ट्रात सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास करण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये गुहागर येथे सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवलेली ‘बागेश्री’ सात महिन्यात अरबी समुद्रातून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, कन्याकुमारी ते श्रीलंकेपर्यंत पाच हजार किलोमीटर फिरल्याची नोंद आहे. २७ जानेवारी २०२५ रोजी गुहागर येथे नेमलेल्या कासव मित्रांना एका मादीला ०३२३३ क्रमांकाचा लावलेला फ्लिपर टॅग आढळला. तपासाअंती या मादीला १८ मार्च २०२१ रोजी ओडिशा येथे फ्लिपर टॅग केल्याची नोंद आढळली. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची ही मादी गुहागर समुद्रकिनारी सुमारे ३५०० किलोमीटर प्रवास करून अंडी घालण्यासाठी आली होती. या वर्षीही रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मिळून ६४ माद्यांना टॅगिंग करण्यात आले आहे.


कासवांचा स्थलांतर पॅटर्न, अधिवासाची निवड, खाद्याची उपलब्धता, वातावरणातील बदल, जागतिक तापमान वाढ आणि अंडी घालण्यासाठी सुरक्षित ठिकाणे आदी अनेक घटक याला कारणीभूत असू शकतात, अशा अनेक बाबी कासवांच्या स्थलांतराविषयी अभ्यासकांकडून नोंदविण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका