कोकणातील सुरक्षित किनाऱ्यांचे कासवांना आकर्षण

बहुसंख्य माद्यांचा समुद्र किनारी मुक्काम


रत्नागिरी : गेल्या दोन वर्षात दापोली, गुहागर, राजापूर आणि रत्नागिरी या तालुक्यांमधील सागर किनाऱ्यांवर कासवे मोठ्या प्रमाणावर येऊन मुक्काम करू लागली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात येथील किनाऱ्यांवर कासवांची घरटी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहेत. कोकणातील सुरक्षित समुद्र किनाऱ्यांमुळेच कासवांची पावले या ठिकाणी वळली असावीत.


ओडिशा येथे साधारणपणे १९७० च्या सुमारास कासवांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. यातूनच कासवांना फ्लिपर मेटल टॅग लावण्यात आले. आतापर्यंत ओडिशामध्ये टॅग केलेल्या कासवांपैकी बहुसंख्य कासव तामिळनाडूच्या गल्फ ऑफ मन्नारपर्यंत आणि श्रीलंकेपर्यंत गेली आहेत. यातील बहुसंख्य माद्या त्याच भागात परत अंडी घालण्यासाठी आल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे.



वनविभाग, कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रथमच महाराष्ट्रात सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास करण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये गुहागर येथे सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवलेली ‘बागेश्री’ सात महिन्यात अरबी समुद्रातून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, कन्याकुमारी ते श्रीलंकेपर्यंत पाच हजार किलोमीटर फिरल्याची नोंद आहे. २७ जानेवारी २०२५ रोजी गुहागर येथे नेमलेल्या कासव मित्रांना एका मादीला ०३२३३ क्रमांकाचा लावलेला फ्लिपर टॅग आढळला. तपासाअंती या मादीला १८ मार्च २०२१ रोजी ओडिशा येथे फ्लिपर टॅग केल्याची नोंद आढळली. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची ही मादी गुहागर समुद्रकिनारी सुमारे ३५०० किलोमीटर प्रवास करून अंडी घालण्यासाठी आली होती. या वर्षीही रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मिळून ६४ माद्यांना टॅगिंग करण्यात आले आहे.


कासवांचा स्थलांतर पॅटर्न, अधिवासाची निवड, खाद्याची उपलब्धता, वातावरणातील बदल, जागतिक तापमान वाढ आणि अंडी घालण्यासाठी सुरक्षित ठिकाणे आदी अनेक घटक याला कारणीभूत असू शकतात, अशा अनेक बाबी कासवांच्या स्थलांतराविषयी अभ्यासकांकडून नोंदविण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक