शिर्डी साई संस्थानकडे तब्बल ५१४ किलो सोनं! कुठे आहे एवढं सोनं? सीईओ गाडीलकरांनी दिली माहिती

शिर्डी : जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या चरणी अखंड भक्तीभावाने दान करणाऱ्या भक्तांमुळे शिर्डी साईबाबा संस्थान हे देशातील सर्वात संपन्न धार्मिक संस्थांपैकी एक मानलं जातं. याच संस्थेकडे सध्या ५१४ किलो सोनं असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.


त्यांनी सांगितलं की, या ५१४ किलो सोन्यापैकी निम्मं सोनं रोजच्या पूजाविधी, सिंहासन, मुकुट, हार यांसाठी वापरलं जातं. उर्वरित सोनं मंदिर परिसरातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आलं आहे.



सोन्याची नाणी करण्याचा प्रस्ताव न्यायप्रविष्ट


२०२१ मध्ये १५५ किलो सोनं वितळवून १, २ व ५ ग्रॅमची नाणी तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यानंतर २०२३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. गाडीलकर यांनी स्पष्ट केलं की, हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे.



भक्तांकडून दानाचा ओघ सुरुच


साई संस्थान दरवर्षी कोट्यवधींचं दान स्वीकारतं. यामध्ये रोकड, मौल्यवान दागदागिने यांचा समावेश असतो.


विशेष म्हणजे, नुकतंच दुबईहून आलेल्या एका भाविकाने २७० ग्रॅम सोन्याचं 'ॐ साई राम' नाव मंदिरात अर्पण केले आहे.


शिर्डी साई संस्थानचं हे सोने मंदिरासाठी केवळ संपत्ती नव्हे, तर भाविकांच्या श्रद्धेचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे.

Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा