शिर्डी साई संस्थानकडे तब्बल ५१४ किलो सोनं! कुठे आहे एवढं सोनं? सीईओ गाडीलकरांनी दिली माहिती

शिर्डी : जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या चरणी अखंड भक्तीभावाने दान करणाऱ्या भक्तांमुळे शिर्डी साईबाबा संस्थान हे देशातील सर्वात संपन्न धार्मिक संस्थांपैकी एक मानलं जातं. याच संस्थेकडे सध्या ५१४ किलो सोनं असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.


त्यांनी सांगितलं की, या ५१४ किलो सोन्यापैकी निम्मं सोनं रोजच्या पूजाविधी, सिंहासन, मुकुट, हार यांसाठी वापरलं जातं. उर्वरित सोनं मंदिर परिसरातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आलं आहे.



सोन्याची नाणी करण्याचा प्रस्ताव न्यायप्रविष्ट


२०२१ मध्ये १५५ किलो सोनं वितळवून १, २ व ५ ग्रॅमची नाणी तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यानंतर २०२३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. गाडीलकर यांनी स्पष्ट केलं की, हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे.



भक्तांकडून दानाचा ओघ सुरुच


साई संस्थान दरवर्षी कोट्यवधींचं दान स्वीकारतं. यामध्ये रोकड, मौल्यवान दागदागिने यांचा समावेश असतो.


विशेष म्हणजे, नुकतंच दुबईहून आलेल्या एका भाविकाने २७० ग्रॅम सोन्याचं 'ॐ साई राम' नाव मंदिरात अर्पण केले आहे.


शिर्डी साई संस्थानचं हे सोने मंदिरासाठी केवळ संपत्ती नव्हे, तर भाविकांच्या श्रद्धेचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत