शिर्डी संस्थानची 'डोनेशन पॉलिसी' लागू, साई भक्तांसाठी १० हजारात थेट आरती!

शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भाविकांसाठी नवी ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून, आता केवळ १०,००० देणगी देणाऱ्यालाही थेट आरतीचा मान मिळणार आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर तयार केलेली ही योजना उच्च देणगीदार भक्तांसाठी विशेष सुविधा देणार आहे.


याआधी २५,००० देणाऱ्यांनाच आरती व विशेष दर्शनाचा लाभ मिळत होता. मात्र आता ही मर्यादा घटवून १०,००० करण्यात आली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, “देणगीदार भाविकांची सेवा ही आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार ही योजना आखली गेली आहे.”



नव्या धोरणात काय मिळणार?




  • १०,००० – ५०,००० देणगी: ५ भाविकांसाठी एक व्हीआयपी आरती




  • ५०,००० – १ लाख: दोन आरत्या व वर्षातून एकदा ५ जणांना मोफत दर्शन




  • १ लाख – १० लाख: दोन VVIP आरत्या व वर्षातून एकदा लाईफटाईम दर्शन




  • १० लाख – १५ लाख: दोन VVIP आरत्या, ५ जणांना वर्षातून एकदा लाईफटाईम VIP दर्शन




  • ५० लाखांहून अधिक देणगी: तीन VVIP आरत्या व वर्षातून दोनदा लाईफटाईम VIP दर्शन




यासोबतच, पंढरपूरच्या धर्तीवर एक नवी अट लागू करण्यात आली आहे. सामान्य दर्शन रांगेत सुरुवातीस येणाऱ्या दोन भाविकांनाही आरतीसाठी प्रवेश दिला जाणार आहे.


या नव्या धोरणामुळे साई भक्तांना सेवा-सुविधा अधिक सुलभ होणार असून, संस्थानला आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळणार असल्याचं मानलं जात आहे.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या