शस्त्रसंधी झाली पण सायबर हल्ले सुरुच! भारतावर तब्बल १.५ कोटी सायबर हल्ले

मुंबई : शस्त्रसंधी करुन पाकिस्तानसोबत लष्करी तणाव कमी करण्याचा निर्णय जरी झाला असला, तरी भारतावर सायबर हल्ल्यांचा मारा सुरूच आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. फक्त एप्रिल २२ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल १.५ कोटी सायबर हल्ले झाले असून, त्यापैकी १५० हल्ले यशस्वी ठरले.


सायबर हल्ल्यांमागे पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि मध्यपूर्वेतील देशांचा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डेटा चोरी, विमान आणि महापालिकेच्या यंत्रणा हॅक, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हल्ला अशा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



फेक न्यूजविरोधात मोहिम सुरू


'नेशन फर्स्ट, फॅक्ट फर्स्ट' मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र सायबरने सोशल मीडियावरील ८३ बनावट पोस्ट्सपैकी ३८ पोस्ट हटवल्या आहेत. भारतीय लष्कर व सरकारविरोधात फेक न्यूज प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.



सायबर फ्रॉडविरोधात हेल्पलाइन सक्रिय


ऑनलाईन फसवणुकीविरोधात जनजागृतीसाठी १९३० आणि १९४५ या हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या असून, दररोज ७,००० हून अधिक कॉल्स येत आहेत. तातडीने प्रतिसाद देणाऱ्या १०० लाईन्स या नंबरवर काम करत आहेत. २०१९ पासून सायबर फ्रॉडमधून तब्बल ₹६०० कोटी वाचवले गेले असून, केवळ मागील सहा महिन्यांतच ₹२०० कोटींची बचत झाली आहे.



सायबर गुलामगिरीतून सुटका


सायबर क्राईमच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. लाओसमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या महाराष्ट्रातील सहा तरुणांची सुटका करण्यात आली आहे. या तरुणांना वीजेचे झटके देणे, नखे उपटणे अशा अमानुष छळाचा सामना करावा लागत होता.



CA विद्यार्थ्याकडून धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट


दरम्यान, इंदोरमधून ३९ वर्षीय CA विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. तो २०२१ पासून सात सोशल मीडियावर हिंदू देवतांविषयी अपमानास्पद पोस्ट करत होता. ही बाब राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

Comments
Add Comment

Andaman Natural Gas : अंदमान समुद्रात भारताला नैसर्गिक वायूचा मोठा साठा; ऊर्जा क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरणार

नवी दिल्ली : भारताच्या समुद्री ऊर्जा (Offshore Energy) संशोधनात एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. ऑईल इंडिया लिमिटेड (OIL) ने

Manipur : मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार, महिलेसह तिघांची हत्या

कांगपोकपी : मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यातील सैतु-गाम्फाजोल उपमंडळातील लोइबोल खुल्लेन गावात शुक्रवार ५ जून

Monsoon 2026 : आनंदाची बातमी, मान्सून गोव्यात पोहोचला

लवकरच महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकणार पणजी : मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला असून सध्या

धक्कादायक! पंजाबमध्ये खासगी कंपनीत महिला कर्मचाऱ्याची सहकाऱ्याकडून हत्या; आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

पंजाब: पंजाबमधील मोहाली (Mohali crime) येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेची

PMMVY : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना गरोदर महिलांना मिळणार ११,००० रुपयांपर्यंतचा लाभ; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत

NEW DELHI : केंद्र सरकारकडून गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी ‘प्रधानमंत्री मातृ वंदना

Noida Massive Fire : नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; रहिवाशांमध्ये घबराट

नोएडा : नोएडातील सेक्टर ७५ परिसरातील आयव्ही काउंटी या निवासी सोसायटीमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण आग (Massive Fire)