शस्त्रसंधी झाली पण सायबर हल्ले सुरुच! भारतावर तब्बल १.५ कोटी सायबर हल्ले

मुंबई : शस्त्रसंधी करुन पाकिस्तानसोबत लष्करी तणाव कमी करण्याचा निर्णय जरी झाला असला, तरी भारतावर सायबर हल्ल्यांचा मारा सुरूच आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. फक्त एप्रिल २२ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल १.५ कोटी सायबर हल्ले झाले असून, त्यापैकी १५० हल्ले यशस्वी ठरले.


सायबर हल्ल्यांमागे पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि मध्यपूर्वेतील देशांचा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डेटा चोरी, विमान आणि महापालिकेच्या यंत्रणा हॅक, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हल्ला अशा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



फेक न्यूजविरोधात मोहिम सुरू


'नेशन फर्स्ट, फॅक्ट फर्स्ट' मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र सायबरने सोशल मीडियावरील ८३ बनावट पोस्ट्सपैकी ३८ पोस्ट हटवल्या आहेत. भारतीय लष्कर व सरकारविरोधात फेक न्यूज प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.



सायबर फ्रॉडविरोधात हेल्पलाइन सक्रिय


ऑनलाईन फसवणुकीविरोधात जनजागृतीसाठी १९३० आणि १९४५ या हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या असून, दररोज ७,००० हून अधिक कॉल्स येत आहेत. तातडीने प्रतिसाद देणाऱ्या १०० लाईन्स या नंबरवर काम करत आहेत. २०१९ पासून सायबर फ्रॉडमधून तब्बल ₹६०० कोटी वाचवले गेले असून, केवळ मागील सहा महिन्यांतच ₹२०० कोटींची बचत झाली आहे.



सायबर गुलामगिरीतून सुटका


सायबर क्राईमच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. लाओसमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या महाराष्ट्रातील सहा तरुणांची सुटका करण्यात आली आहे. या तरुणांना वीजेचे झटके देणे, नखे उपटणे अशा अमानुष छळाचा सामना करावा लागत होता.



CA विद्यार्थ्याकडून धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट


दरम्यान, इंदोरमधून ३९ वर्षीय CA विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. तो २०२१ पासून सात सोशल मीडियावर हिंदू देवतांविषयी अपमानास्पद पोस्ट करत होता. ही बाब राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या