Marathi School Closed: धक्कादायक! मुंबईत आतापर्यंत एकूण १०० मराठी शाळा बंद

मुंबई: इंग्रजी माध्यमाचे वाढतं प्रस्थ लक्षात घेता, मुंबईतल्या एकूण १०० मराठी शाळा (Marathi School Closed) बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मराठी माध्यमाच्या, महानगरपालिका शाळांसाठी हा चांगला अहवाल कार्ड नाही.


मुंबईत इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाला अधिक प्राधान्य दिले जात असल्यामुळे, गेल्या दहा वर्षात, तब्बल १०० हून अधिक मराठी शाळा बंद पडल्या आहेत. त्यांपैकी ४० शाळा गेल्या सहा वर्षातच बंद झाल्या आहेत. शिवाय या काळात, मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ५० हजार हून  घटली असल्याचं निदर्शनास आलं आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शिक्षण विभागाकडून मिळालेल्या आणि युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (UDISE) ला सादर केलेल्या आकडेवारीवरून, मराठी माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सतत घट होत असल्याचे दिसून आले. २०१४-१५ शैक्षणिक वर्षात, एकट्या BMC ने ३६८ मराठी माध्यमाच्या शाळा चालवल्या. आता ही संख्या २६२ वर पोहोचली आहे. या अहवालानुसार एका दशकात १०० हून अधिक मराठी शाळा बंद झाल्या आहेत.



दक्षिण मुंबईत मराठी शाळांची दयनीय अवस्था


दक्षिण मुंबईत मराठी शाळांची संख्या झपाट्याने कमी होत आहेत. २०१९ ते २०२५ दरम्यान या विभागातील तब्बल २० मराठी शाळांना टाळं लागलं आहे. दादरच्या नाबर गुरुजी विद्यालयाच्या अलीकडच्या घटनेमुळे, मराठी शाळेच्या अस्तित्वाच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. या शाळेत सध्या इयत्ता ६ वी ते १० वी पर्यन्त फक्त १८ च विद्यार्थी आहेत, व्यवस्थापनाने शेवटचा विद्यार्थी १० वी पूर्ण करेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.



मराठी शाळांमधील कमकुवत पायाभूत सुविधा


अनेक शिक्षक आणि पालक म्हणतात की या बदलाचे एक मुख्य कारण म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळांमधील कमकुवत पायाभूत सुविधा. याउलट, खाजगी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, अगदी काही अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह, चांगल्या भौतिक सुविधा, वातानुकूलित वर्गखोल्या, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा आणि आधुनिक इमारती देतात ज्यामुळे चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्याचे दिसून येते.

Comments
Add Comment

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली