चीनचं मिसाईल, तुर्कीस्तानचे ड्रोन आम्ही पाडले - एअर मार्शल एके भारती

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर बाबत महत्तवाची माहिती दिली आहे. डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल एके भारती यांनी "पाकिस्तानने चीनचं एअर टू एअर मिसाईल PL-15 चा वापर केला होता. पण या मिसाईलने आपलं टार्गेट मिस केलं. फोटोमध्ये तुम्ही या मिसाईलचे तुकडे पाहू शकता. ते आता आमच्याकडे आहेत" असं म्हटलं आहे.


डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही Loiter munitions आणि Unmanned aerial system बद्दल चर्चा केली आहे. आम्ही हे munitions पाडले आहेत. तुम्ही त्याचे फोटो पाहू शकता. एका फोटोचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की ही YIHA सिस्टिम आहे आणि ती तुर्कीमध्ये बनवली आहे. पण आम्ही ते पाडले आहे. "


एके भारती यांनी भविष्यासाठी पाकिस्तानला इशारा दिला आणि म्हटलं की, "आमचे सर्व लष्करी तळ, आमच्या सर्व यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत आणि भविष्यात गरज पडल्यास कोणत्याही मोहिमेसाठी तयार आहेत. आपल्या नवीन यंत्रणेबद्दल बरच काही सांगितलं आणि लिहिलं गेलं आहे परंतु आपल्या जुन्या यंत्रणांनी देखील अद्भुत काम केलं आहे. आमच्या या यंत्रणांनी पाकिस्तानचे आधुनिक पिढीचे ड्रोन आणि मिसाईल देखील पाडली आहेत. युद्धात आपली ताकद दाखवणाऱ्या आपल्या या यंत्रणांनी पाकिस्तानी हल्ल्याला थेट आव्हान दिलं आणि शत्रूची शस्त्रे नष्ट केली. याशिवाय गरज पडल्यास आमची उपकरणं भविष्यातील कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत."


भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी "ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करणं आहे. आपण १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला" असल्याचं म्हटलं आहे. तसेच दहशतवाद्यांचे अड्डे उडवून दिल्याचे पुरावे दाखवले. दहशतवादी हल्ल्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये मुदस्सर, हाफिज जमील आणि युसूफ अझहर असे तीन मोठे दहशतवादी मारले गेले आहेत.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर