चीनचं मिसाईल, तुर्कीस्तानचे ड्रोन आम्ही पाडले - एअर मार्शल एके भारती

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर बाबत महत्तवाची माहिती दिली आहे. डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल एके भारती यांनी "पाकिस्तानने चीनचं एअर टू एअर मिसाईल PL-15 चा वापर केला होता. पण या मिसाईलने आपलं टार्गेट मिस केलं. फोटोमध्ये तुम्ही या मिसाईलचे तुकडे पाहू शकता. ते आता आमच्याकडे आहेत" असं म्हटलं आहे.


डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही Loiter munitions आणि Unmanned aerial system बद्दल चर्चा केली आहे. आम्ही हे munitions पाडले आहेत. तुम्ही त्याचे फोटो पाहू शकता. एका फोटोचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की ही YIHA सिस्टिम आहे आणि ती तुर्कीमध्ये बनवली आहे. पण आम्ही ते पाडले आहे. "


एके भारती यांनी भविष्यासाठी पाकिस्तानला इशारा दिला आणि म्हटलं की, "आमचे सर्व लष्करी तळ, आमच्या सर्व यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत आणि भविष्यात गरज पडल्यास कोणत्याही मोहिमेसाठी तयार आहेत. आपल्या नवीन यंत्रणेबद्दल बरच काही सांगितलं आणि लिहिलं गेलं आहे परंतु आपल्या जुन्या यंत्रणांनी देखील अद्भुत काम केलं आहे. आमच्या या यंत्रणांनी पाकिस्तानचे आधुनिक पिढीचे ड्रोन आणि मिसाईल देखील पाडली आहेत. युद्धात आपली ताकद दाखवणाऱ्या आपल्या या यंत्रणांनी पाकिस्तानी हल्ल्याला थेट आव्हान दिलं आणि शत्रूची शस्त्रे नष्ट केली. याशिवाय गरज पडल्यास आमची उपकरणं भविष्यातील कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत."


भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी "ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करणं आहे. आपण १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला" असल्याचं म्हटलं आहे. तसेच दहशतवाद्यांचे अड्डे उडवून दिल्याचे पुरावे दाखवले. दहशतवादी हल्ल्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये मुदस्सर, हाफिज जमील आणि युसूफ अझहर असे तीन मोठे दहशतवादी मारले गेले आहेत.

Comments
Add Comment

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि