'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम: १७ चिमुरड्यांना मिळाले 'सिंदूर' हे नाव!

उत्तर प्रदेश : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने केवळ पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर जनतेच्या मनात एक गडद लाल ठसा उमटवला आहे. आज तो 'सिंदूर' एक कारवाई नसून भावना बनली आहे. याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले आहे उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात.


२२ एप्रिल रोजी पहलगामजवळ बैसरन भागात दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण गोळीबारात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांचा नाश केला. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यालाही भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.



या पराक्रमाच्या प्रेरणेतून, कुशीनगर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये १० व ११ मे रोजी जन्मलेल्या १७ नवजात मुलींना 'सिंदूर' हे नाव देण्यात आले आहे. मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. शाही यांनी ही माहिती दिली. हे नाव आता शौर्य, त्याग आणि देशप्रेमाचे प्रतीक ठरत आहे.


या घटनेमुळे स्पष्ट होते की, केवळ सीमेवर नव्हे, तर सामान्य नागरिकांच्याही हृदयात 'देशभक्ती'चा रंग भरलेला आहे. 'सिंदूर' आता लढाईचे नाव नाही, तर नव्या पिढीचा आत्मगौरव आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी