'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम: १७ चिमुरड्यांना मिळाले 'सिंदूर' हे नाव!

उत्तर प्रदेश : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने केवळ पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर जनतेच्या मनात एक गडद लाल ठसा उमटवला आहे. आज तो 'सिंदूर' एक कारवाई नसून भावना बनली आहे. याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले आहे उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात.


२२ एप्रिल रोजी पहलगामजवळ बैसरन भागात दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण गोळीबारात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांचा नाश केला. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यालाही भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.



या पराक्रमाच्या प्रेरणेतून, कुशीनगर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये १० व ११ मे रोजी जन्मलेल्या १७ नवजात मुलींना 'सिंदूर' हे नाव देण्यात आले आहे. मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. शाही यांनी ही माहिती दिली. हे नाव आता शौर्य, त्याग आणि देशप्रेमाचे प्रतीक ठरत आहे.


या घटनेमुळे स्पष्ट होते की, केवळ सीमेवर नव्हे, तर सामान्य नागरिकांच्याही हृदयात 'देशभक्ती'चा रंग भरलेला आहे. 'सिंदूर' आता लढाईचे नाव नाही, तर नव्या पिढीचा आत्मगौरव आहे.

Comments
Add Comment

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली