'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम: १७ चिमुरड्यांना मिळाले 'सिंदूर' हे नाव!

उत्तर प्रदेश : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने केवळ पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर जनतेच्या मनात एक गडद लाल ठसा उमटवला आहे. आज तो 'सिंदूर' एक कारवाई नसून भावना बनली आहे. याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले आहे उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात.


२२ एप्रिल रोजी पहलगामजवळ बैसरन भागात दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण गोळीबारात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांचा नाश केला. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यालाही भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.



या पराक्रमाच्या प्रेरणेतून, कुशीनगर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये १० व ११ मे रोजी जन्मलेल्या १७ नवजात मुलींना 'सिंदूर' हे नाव देण्यात आले आहे. मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. शाही यांनी ही माहिती दिली. हे नाव आता शौर्य, त्याग आणि देशप्रेमाचे प्रतीक ठरत आहे.


या घटनेमुळे स्पष्ट होते की, केवळ सीमेवर नव्हे, तर सामान्य नागरिकांच्याही हृदयात 'देशभक्ती'चा रंग भरलेला आहे. 'सिंदूर' आता लढाईचे नाव नाही, तर नव्या पिढीचा आत्मगौरव आहे.

Comments
Add Comment

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि