जगातील सर्वात मोठ्या गोवर्धन गोशाळेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली : करंजेच्या माळरानावर उभे झालेले नंदनवन म्हणजे कै. तातु सिताराम राणे ट्रस्ट संचलीत गोवर्धन गोशाळा! या गोशाळेचा दिमाखदार शुभारंभ रविवारी ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व मंत्रीगण उपस्थित होते.


हिरव्या वनराईने नटलेल्या, निसर्गरम्य करंजे गावात सुमारे ७० एकर जागेत अत्याधुनिक ‘गोशाळा’ उभारण्यात आली आहे. या गोशाळेत गीर, साहीवाल, देवणी, पुंगनूर आदी भारतातील व महाराष्ट्रातील विविध जातींच्या तसेच खिल्लार, स्थानिक कोकण कपिला अशा विविध गायी आहेत. करंजे गावातील गोशाळेत दुधापासून तयार केले जाणारे विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. गोमूत्र वापरुन तयार केलेली ओषधे, खते, गोबरगॅस आणि रंग यांची खरेदी या गोशाळेच्या माध्यमातून लवकरच करता येईल.


करंजेमध्ये गोशाळेसह शेळी - मेंढीपालन, कुक्कुटपालन हे प्रकल्पही लवकरच सुरू केले जाणार आहेत. या प्रकल्पांमुळे करंजे तसेच आसपासच्या गावांतील तरुण - तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. पशुपालन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, खत निर्मिती,दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आदी विषयावर विविध चर्चासत्रे, अभ्यास शिबीरे, कार्यशाळा घेण्याचेही गोशाळेचे नियोजन आहे. या कार्यक्रमांमध्ये तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.




 
Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका