मोदींच्या गुजरातमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, भारताच्या एअर डिफेन्स गनने उडवला धुरळा

कच्छ: भारताने दहशतवादविरुद्ध केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तान बिथरला असून, पाकने भारतीय सीमारेषेवरील ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचे हे हल्ले भारत यशस्वीरित्या परतवून लावत आहे. दरम्यान, गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचा सशस्त्र ड्रोन यशस्वीरित्या पाडला असल्याची माहिती संरक्षक अधिकाऱ्यांनी दिली आहे.


जम्मू-काश्मीरपासून पंजाब आणि राजस्थानपर्यंत पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लष्कराने सकाळीच दावा केला आहे की त्यांच्या तीन हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे बिथरलेल्या पाकड्यांनी भारताच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे.



सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न


पाकिस्तान जम्मू-काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या २४ तासांत पाकिस्तानने २६ ठिकाणी हल्ले केले. यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी अधूनमधून गोळीबार सुरू आहे.



जालंधर ग्रामीणमधील एका गावातील शेतात ड्रोनचे तुकडे


गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचा एक सशस्त्र ड्रोन यशस्वीरित्या पाडला. दरम्यान, जालंधर ग्रामीणमधील एका गावातील शेतात क्षेपणास्त्राचे तुकडे आढळले. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane: छत्रपती शिवाजी महाराजांचा ते कधीच आदर करणार नाहीत", नितेश राणे यांची काँग्रेसवर टिका

शिवाजीनगर मेट्रो स्टेशन वादावर नितेश राणे यांनी काँग्रेसला औरंगजेबाचे समर्थक म्हटले मुंबई: कर्नाटक मेट्रो

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.