मोदींच्या गुजरातमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, भारताच्या एअर डिफेन्स गनने उडवला धुरळा

कच्छ: भारताने दहशतवादविरुद्ध केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तान बिथरला असून, पाकने भारतीय सीमारेषेवरील ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचे हे हल्ले भारत यशस्वीरित्या परतवून लावत आहे. दरम्यान, गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचा सशस्त्र ड्रोन यशस्वीरित्या पाडला असल्याची माहिती संरक्षक अधिकाऱ्यांनी दिली आहे.


जम्मू-काश्मीरपासून पंजाब आणि राजस्थानपर्यंत पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लष्कराने सकाळीच दावा केला आहे की त्यांच्या तीन हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे बिथरलेल्या पाकड्यांनी भारताच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे.



सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न


पाकिस्तान जम्मू-काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या २४ तासांत पाकिस्तानने २६ ठिकाणी हल्ले केले. यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी अधूनमधून गोळीबार सुरू आहे.



जालंधर ग्रामीणमधील एका गावातील शेतात ड्रोनचे तुकडे


गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचा एक सशस्त्र ड्रोन यशस्वीरित्या पाडला. दरम्यान, जालंधर ग्रामीणमधील एका गावातील शेतात क्षेपणास्त्राचे तुकडे आढळले. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Comments
Add Comment

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या