Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai Metro Aqua Line 3) मार्गिकेच्या विस्तारीत स्थानकांचे उद्घाटन आज दिनांक 9 मे, शुक्रवार रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले.


यापूर्वी, अ‍ॅक्वा लाईन-३ च्या एकूण ३३.५ किमी लांबीपैकी, आरे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पर्यंतचा १२.६९ किमी लांबीचा भाग ७ ऑक्टोबर २०२४ पासून आधीच कार्यान्वित झाला आहे. त्यानुसार धारावी ते आचार्य अत्रे चौक या ९.७७ किमी लांबीच्या आणि सहा स्थानकांवर कोटक बीकेसी मेट्रो स्टेशनच्या पलीकडे रेल्वे वाहतूक सेवा याधीच सुरू करण्यात आली आहे. ज्याच्या उर्वरित भागाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.



आरे-जेव्हीएलआर ते वरळी प्रवास आणखीन जलद


मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन-३ (आरे-बीकेसी-अत्रे चौक) चा शुक्रवारपासून संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यावर, मुंबई उपनगरातील आरे-जेव्हीएलआर ते दक्षिण मुंबईतील वरळी येथील आचार्य अत्रे चौकापर्यंत प्रवास करण्यासाठी फक्त ३९ मिनिटे लागतील.



विस्तारित विभागातील स्थानकं


सध्या कार्यरत असलेल्या आरे ते बीकेसी विभागात १० स्थानके आहेत. ज्यात दोन विमानतळ स्थानकं समाविष्ट आहेत, तर विस्तारित विभागातील स्थानकांमध्ये कोटक बीकेसी, धारावी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक यांचा समावेश आहे.






26 भूमिगत मेट्रोचा प्रमुख प्रकल्प


मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन ३ ही उपनगरीय रेल्वे, इतर मुंबई मेट्रो लाईन्स आणि सुमारे आठ ठिकाणी असलेल्या विद्यमान वाहतूक पद्धतींशी एकत्रित केली आहे.  २६ भूमिगत स्थानके असलेला ३३.५ किमी लांबीचा कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ कॉरिडॉर हा शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एक प्रमुख प्रकल्प आहे.


यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि चर्चगेट, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल आणि दादर स्टेशन समाविष्ट आहेत, जे सर्व सुमारे १० मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर आहेत. महालक्ष्मी येथे ही लाईन मोनोरेल स्टेशनजवळ आहे आणि बीकेसी येथे ती मुंबई मेट्रो लाईन २-बी आणि मेट्रो लाईन १ शी एकत्रित करण्यात आली आहे. या मार्गाचा शेवटचा टप्पा २०२५ च्या अखेरीस कुलाब्यापर्यंत होण्याचा अंदाज आहे.



भारतातील पहिली भूमिगत मेट्रो


ही सेवा भारतातील पहिली भूमिगत मेट्रो असेल. बीकेसी आणि धारावी स्थानकांदरम्यान नदीखाली जाणारा दुहेरी बोगदा मिठी नदी ओलांडतो. दोन्ही स्थानकांमधील संपूर्ण ३ किमीच्या जुळ्या बोगद्याच्या विभागात, सुमारे २ किमी एका विस्तारित जलसाठ्याखाली जातो, ज्यामध्ये सक्रिय मिठी नदीच्या पात्राचा ५०० मीटरचा भाग समाविष्ट आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी, पाण्याखाली बोगद्यासाठी विशेषतः डिझाइन केलेले पृथ्वी संतुलन यंत्र विकसित करण्यात आले.

Comments
Add Comment

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

Ashish Shelar : "विठ्ठलाला घेरणाऱ्या बडव्यांशी आता गळ्यात गळे का?"; आशिष शेलारांचा राज-उद्धव युतीवर जहरी प्रहार!

शेलारांचा 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलने पलटवार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय