आयपीएल २०२५ चे सामने आता 'या' दिवशी खेळवण्याची शक्यता

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. हा निर्णय बीसीसीआयने शुक्रवारी जाहीर केला आहे. आता आयपीएलचे उर्वरित सामने कधी खेळवले जातील यावर चर्चा सुरू आहे.याबाबतची माहिती आता समोर आली आहे.


मिळालेल्हा माहितीनुसार, भारत-पाकिस्तान यांच्यातल्या तणावजन्य परस्थितीचा आधी आढावा घेतला जाईल. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआय ऑगस्ट महिन्याचा विचार करू शकते. या कालावधीत भारतीय संघ तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणे अपेक्षित आहे. पण, सदस्यस्थिती पाहता हा दौरा होणार नसल्याचेच संकेत आहेत. बीसीसीआय या विंडोचा आयपीएलसाठी विचार करू शकेल. पण, भारतात तेव्हा पावसाळा असल्याने दुसऱ्या देशात हे सामने होतील.


हा पर्याय काही कारणास्तव यशस्वी न झाल्यास बीसीसीआय आशिया चषक स्पर्धेच्या विंडोचा वापर करू शकते. भारत-पाकिस्तान तणावात हा स्पर्धेवरही संकट आहेच. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि तेव्हा आयपीएलचे उर्वरित सामने होऊ शकतात. भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे. या दौऱ्यानंतरच्या विंडोचा आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांसाठी विचार केला जाऊ शकतो.


पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारताच्या सीमाभागांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे धर्मशाला येथे खेळवण्यात आलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना मध्येच थांबवण्यात आला होता आणि नंतर तो रद्द केला गेला.पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंना, सहाय्यक स्टाफ आणि ब्रॉडकास्टर्सना बीसीसीआयने विशेष ट्रेनने दिल्लीला आणण्याची तयारी केली आहे. कारण धर्मशाला येथील विमानतळ १० मे पर्यंत बंद ठेवल्यामुळे ट्रेनची सुविधा करावी लागली आहे. शुक्रवारी सकाळी सर्व खेळाडू या ट्रेनने दिल्लीसाठी रवाना झाले.तेव्हाच आयपीएलच्या पुढील सामन्यांबाबत चिंता व्यक्त केली गेली होती. आज अखेर बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी आयपीएलचे पुढचे सामने स्थगित केल्याचे जाहीर केले.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देताना ऑपरेशन सिंदूर अतंर्गत पाकिस्तानातील दहशतावद्यांची ९ तळं उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारताच्या सीमाभागांवर ड्रोन हल्ले केले. भारतीय जवानांनी त्यांचे हे हर्व हल्ले परतवून लावताना पाकिस्तानचे तीन लढाऊ विमानं पाडली. पाकिस्तानकडून यापुढेही कुरापती सुरू राहणार असल्याची संकेत आहेत आणि भारतीय लष्कर त्यासाठी सज्ज आहे.

Comments
Add Comment

Cristiano Ronaldo : ‘हाच माझा शेवटचा विश्वचषक!’ क्रिस्टियानो रोनाल्डोच्या भावनिक घोषणेनंतर फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का

नवी दिल्ली : जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) आपल्या

Women's T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा महिला टी-२० क्रिकेटवर दबदबा कायम; इंग्लंडला हरवत विक्रमी सातव्यांदा विश्वविजेते

Women's T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध करत टी-२०

FIFA WORLDCUP 2026 : १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडची मेक्सिकोवर मात; उपांत्यपूर्व फेरीत एर्लिंग हालंडच्या नॉर्वेशी होणार गाठ

मेक्सिको सिटी: एस्टाडिओ अझ्टेका स्टेडियमवर रव

FIFA WORLDCUP 2026 : अर्लिंग हालंडच्या झंझावाताने ब्राझील चितपट; नॉर्वे पहिल्यांदाच विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत

ईस्ट रदरफोर्ड, एनजे: फुटबॉलच्या जगाला हादरवून टाकणाऱ्या एका ऐतिहासिक सामन्यात, नॉर्वेने पाच वेळच्या

Wimbledon 2026 Serena Williams : गुडघ्याच्या दुखापतीमुळे सेरेना विल्यम्सची दुहेरीतून माघार

लंडन : अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सने (Wimbledon 2026 Serena Williams) गुडघ्याच्या दुखापतीमुळे विम्बल्डन २०२६ मधील महिला

T20 Cricket : वैभव सूर्यवंशीच्या दमदार पदार्पणावर पाणी; इंग्लंडचा भारतावर ४ गडी राखून विजय

मँचेस्टर : भारताच्या युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार सुरुवात केली.