ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत हाय अलर्ट; मंदिर आणि विमानतळाच्या सुरक्षेचा आढावा

शिर्डी : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्री साईबाबा मंदिर आणि साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. आज सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह साईबाबा मंदिर आणि शिर्डी विमानतळ या दोन्ही ठिकाणी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.


या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि मंदिर सुरक्षा प्रमुख सतीश गोटेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.मंदिराच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली असून, मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची तसेच स्थानिक नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे.



परिसरात येणाऱ्या ग्रामस्थांची आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. यासोबतच मंदिरात आणले जाणारे फूल आणि प्रसादाचे साहित्य देखील बारकाईने तपासले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, दिवसभरात अनेक वेळा बॉम्ब शोधक पथकाकडूनही मंदिराच्या परिसराची तपासणी केली जात आहे.


शिर्डी विमानतळावरही याच धर्तीवर सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून बारकाईने निरीक्षण केले जात आहे. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी दोन्ही ठिकाणांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कंबर कसली आहे.

Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा