प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश दिले आहेत. या सैनिकांना बोलावून देशसेवेत सहभागी करुन घेण्याचे अधिकार केंद्र सरकारने भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना दिले आहेत. सैन्य नियम, १९४८ च्या नियम ३३ अंतर्गत कोणत्याही प्रादेशिक सैन्य अधिकाऱ्याला किंवा जवानाला लष्कराच्या नियमित दलांना मदत करण्यासाठी बोलावण्याचा अधिकार लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना दिले आहेत.



देशात प्रादेशिक सैन्याच्या अर्थात टेरिटोरियल आर्मीच्या ३२ इन्फंट्री बटालियन आहेत. यापैकी १४ बटालियन युद्ध सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बटालियनमधी अधिकारी आणि जवानांना फोन येताच लष्कराच्या नियमित दलांना मदत करण्यासाठी निर्देश दिले जातील त्या सैन्याच्या विभागात कार्यरत व्हायचे आहे. भारतीय लष्करात सदर्न कमांड (दक्षिण कमांड), ईस्टर्न कमांड (पूर्व कमांड), वेस्टर्न कमांड (पश्चिम कमांड), सेंट्रल कमांड (मध्य कमांड), नॉर्दन कमांड (उत्तर कमांड), साऊथ वेस्ट (दक्षिण पश्चिम किंवा नैऋत्य कमांड), अंदमान आणि निकोबार कमांड, आर्मी ट्रेनिंग कमांड हे प्रमुख विभाग आहेत. प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक नोंदणीकृत सैनिकाला आवश्यक गार्ड कर्तव्ये पार पाडण्यासाठी किंवा नियमित सैन्याला पाठिंबा देण्यासाठी सक्रिय केले जाऊ शकते, असे सरकारी आदेशात नमूद आहे.


पाकिस्तानने गुरुवार ८ मे आणि शुक्रवार ९ मे दरम्यान रात्री भारतात ठिकठिकाणी ड्रोन, विमान, रॉकेट, क्षेपणास्त्र यांच्या मदतीने हवाई हल्ला करण्याचे प्रयत्न केले. या व्यतिरिक्त पाकिस्तान सीमेवरील भारतीय नागरी वस्त्यांना लक्ष्य करुन गोळीबार आणि तोफांचा मारा करत होता. पाकिस्तानच्या हल्ल्याला भरताने चोख उत्तर दिले. यानंतर सरकारने तातडीने प्रादेशिक सैन्याला सज्जतेचे आदेश दिले.


भारताच्या प्रादेशिक सैन्यातील मान्यवर : मानद लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी, कॅप्टन सचिन तेंडुकर, मानद ग्रुप कॅप्टन सचिन रमेश तेंडुलकर, कॅप्टन अनुराग ठाकूर, मेजर अभिनव बिंद्रा, मानद कर्नल कपिल देव, लेफ्टनंट दीप्ती राणा
Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ