Operation Sindoor : का दिलं ऑपरेशन सिंदूर नाव?

भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. हा सूड उगवण्यासाठी दहशतवादी ठिकाणांवर तिन्ही सैन्य दलांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलंय. काय आहे ऑपरेशन सिंदूर आणि का ऑपरेशन सिंदूर नाव दिलं गेलं? जाणून घेऊयात या लेखातून...


भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली. यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. ऑपरेशन सिंदूर या शब्दामागे शौर्य प्रतीक आणि भावना यांचं महत्त्व आहे. पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांना मारण्यात आलं होतं. हिंदू आहात का असं विचारून दहशतवाद्यांनी अनेकांना गोळ्या घातल्या होत्या. दहशतवाद्यांनी क्रूरतेने विवाहितांचं कुंकू पुसलं होतं. कुंकू हे महिलांचं सौभाग्यांचं प्रतीक. मात्र दशतवाद्यांनी कोणताही विचार न करता या महिलांसमोर त्यांच्या पतींना मारलं होतं. याचा हिशोब चुकवण्यासाठी, बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव सुचवलं होतं. त्याला लष्काराने मान्यता दिली होती.


?si=bEeRr-uHUmdxntvS

सिंदूर म्हणजे काय ?


सिंदूर म्हणजे मराठीमध्ये त्याला कुंकू म्हणतात. हे कुंकू सौभाग्याचं प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये कुंकूला खूप महत्त्व आहे. विवाहितांच्या भांगामध्ये कुंकू भरलं जातं. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौसेनेचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृ्त्यू झाला होता. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. दहशतवाद्यांनी नरवाल यांना मारल्यानंतर त्यांच्या पत्नीचा शोक अख्या जगाने पाहिला. यावेळी त्यांच्या भांगामध्ये भरलेलं सिंदूर अर्थात कुंकू सर्वांनी पाहिलं होतं. त्यानंतर दहशतवाद्यांचा बदला घ्या अशा भावना तमाम भारतीयांनी व्यक्त केल्या होता. त्यामुळे दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरचा संकल्प केला. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्याबरोबर शहिदांचा सन्मान आणि त्यांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची मोहीम आखण्यात आली.



काय आहे 'सिंदूर'ची परंपरा पाहुयात...


हिंदू धर्मातील स्त्रिया या प्राचीन काळापासून कपाळावर 'कुंकू' लावत आहेत. हिंदू धर्मात विवाहित स्त्रीच्या आयुष्यात कुंकवाचे महत्त्व फार मोठं आहे. कुंकू हे लाल रंगाचं असतं आणि लाल रंग हा शक्तीचं प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर कुंकू हे सौभाग्याचे, प्रेमाचे आणि भरभराटीचे प्रतीक मानलं जातं. भारताने पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूरनं दिलं आहे. या हल्ल्यात अनेक विवाहितांचं कुंकू पुसलं गेलं. आता त्यांना न्याय मिळाला आहे. विवाहितेचं सौभाग्य हिरावणाऱ्या दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूरअंतर्गत कडक संदेश देण्यात आलाय.

Comments
Add Comment

 Monsoon Food : पावसाळ्यात शरीर उबदार ठेवणारे ८ पारंपरिक पदार्थ

पावसाळ्यात चव आणि आरोग्य दोन्ही जपा आणि हे पदार्थ नक्की खा   गरमागरम मसाला चहा आलं, वेलची आणि दालचिनीचा मसाला

The India Story: Slow Poison in Progress' : द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित, 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दैनंदिन जीवनात आपण खात असलेल्या अन्नातून शरीरात जाणाऱ्या रसायनांमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा

John Abraham : जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री ! जॉन अब्राहम आता 'या' टीमचा झाला मालक

John Abraham Enters in Cricket : अभिनेता शाहरुख खान तसेच अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलीवूड अभिनेता जॉन

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Nashik : नाशिकच्या दोन महत्त्वाच्या रुग्णालयांसाठी पदनिर्मितीस शासनाची मंजुरी, आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश

Nashik : नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयातील (Sandarbh Services Hospital) पेडियाट्रिक, न्युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी व अर्भक