पाकिस्तानच्या गोळीबारात आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात १३ ठार आणि ५९ जखमी

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' केल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतात सीमेजवळ असलेल्या गावांना लक्ष्य केले. पाकिस्तानने भारतात सीमेजवळ असलेल्या गावांच्या दिशेने गोळीबार आणि तोफगाळ्यांचा मारा सुरू केला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यात आतापर्यंत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५९ नागरिक जखमी झाले आहेत. जखमींपैकी ४४ नागरिक जम्मू काश्मीरमधील पूँछ भागातले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यात ठार झालेले सर्व नागरिकही पूँछ भागातले आहेत.


पाकिस्तानच्या गोळीबार आणि तोफगाळ्यांचा माऱ्याबाबतची माहिती मिळताच पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोव्हल यांच्याशी तातडीने चर्चा केली. यानंतर पंतप्रधान मोदी आणि वरिष्ठ मंत्री यांच्यातही चर्चा झाली. याआधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संसद ग्रंथालय इमारतीच्या समिती कक्ष जी - ०७४ नवी दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्रीही पंतप्रधान मोदींच्या सरकारी निवासस्थानी पोहोचले.


'ऑपरेशन सिंदूर अजून सुरू आहे'


ऑपरेशन सिंदूर अजून सुरू आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सर्वपक्षीय बैठकीत बोलले. त्यांनी ऑपरेशन सुरू असल्यामुळे जास्त माहिती देणे शक्य नाही, असे सांगत ७ मे रोजी कारवाईची थोडक्यात माहिती दिली. बुधवार ७ मे रोजी केलेल्या कारवाईत किमान १०० अतिरेकी ठार झाल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.


फिरोजपूरमध्ये घुसखोर ठार


भारतात पंजाबमधील फिरोजपूरमध्ये सुरक्षा पथकाने एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले. हा घुसखोर भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात होता, असे सुरक्षा पथकांनी सांगितले.


बिहारमध्ये चार चिनी नागरिकांना अटक


भारत - पाकिस्तान तणाव वाढला असतानाच बिहारमध्ये सुरक्षा पथकांनी चार चिनी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्या चिनी नागरिकांची चौकशी सुरू आहे.


पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात गुरुवार ८ मे रोजी रात्री नऊ वाजल्यापासून ते शुक्रवार ९ मे रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत असा रात्रभर ब्लॅकआऊट असेल. या ब्लॅकआऊटची घोषणा प्रशासनाने थोड्या वेळापूर्वीच केली आहे.
Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या