Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सिंदूर'!

पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट


देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून उठण्यापूर्वीच भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत नऊ दहशतवादी ठिकाणांवर स्ट्राईक केलं. तिन्ही दलाने केलेल्या संयुक्त कारवाईमुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय.


पहलगाममधील दहशतवाही हल्ल्याचा भारताने बदला घेतलाय. भारताचे सैन्य दल, वायुसेना आणि नौसेना यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवलाय. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. भारताने दहशतवाद्यांचे ९ तळ उदध्वस्त करत चांगलाच धडा शिकवलाय.


?si=UzwCJT1tGF5znFeb

भारताने दहशतवाद्यांच्या एकूण ९ ठिकाणांवर हल्ला केलाय. बहावलपूर, मुझफ्फराबाद, कोटली, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू आणि सियालकोट या ठिकाणांवर स्ट्राईक केलाय. बहावलपूर आणि कोटली हे दहशतवाद्यांचे मोठे अड्डे आहेत. भारताच्या स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांना मोठा फटका बसलाय. वायुदलाने केलेल्या अचूक हल्ल्यामुळे दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झालीय. पहलगाम हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिल्याने पाकिस्तान बिथरलंय.



पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईला भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलंय. पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी नवविवाहित जोडप्यांना लक्ष केलं होतं. याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं आणि ते यशस्वी करून दाखवलं.'सिंदूर'हे नाव हिंदू विवाहित स्त्रियांचे प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर योद्ध्यांसाठीही ते गौरवाचे चिन्ह आहे. सिंदूर हे योद्ध्यांचेही प्रतीक आहे. पूर्वी युद्धात जाण्यापूर्वी योद्धा कपाळावर सिंदूरचा टिळा लावत असत.


भारतीय वायुसेना आणि सैन्य दल यांनी एकत्रित ही कारवाई केली. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येतेय. इतकंच नव्हे तर पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही नष्ट करण्यात आली आहेत. एफ 16 आणि एफ 17 आकाशात नष्ट करण्यात आलीत. आकाश मिसाईलने पाकिस्तानच्या दोन्ही लढावू विमानांना लक्ष केलंय. भारताने आखलेल्या आणि यशस्वी केलेल्या ऑपरशेन सिंदूर मोहिमेचं तमामा भारतीयांनी स्वागत केलंय. भारताने पुन्हा एकदा स्ट्राईक करून जगाचं लक्ष वेधलंय आणि पाकिस्तानला इशारा दिलाय.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना