Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सिंदूर'!

पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट


देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून उठण्यापूर्वीच भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत नऊ दहशतवादी ठिकाणांवर स्ट्राईक केलं. तिन्ही दलाने केलेल्या संयुक्त कारवाईमुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय.


पहलगाममधील दहशतवाही हल्ल्याचा भारताने बदला घेतलाय. भारताचे सैन्य दल, वायुसेना आणि नौसेना यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवलाय. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. भारताने दहशतवाद्यांचे ९ तळ उदध्वस्त करत चांगलाच धडा शिकवलाय.


?si=UzwCJT1tGF5znFeb

भारताने दहशतवाद्यांच्या एकूण ९ ठिकाणांवर हल्ला केलाय. बहावलपूर, मुझफ्फराबाद, कोटली, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू आणि सियालकोट या ठिकाणांवर स्ट्राईक केलाय. बहावलपूर आणि कोटली हे दहशतवाद्यांचे मोठे अड्डे आहेत. भारताच्या स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांना मोठा फटका बसलाय. वायुदलाने केलेल्या अचूक हल्ल्यामुळे दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झालीय. पहलगाम हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिल्याने पाकिस्तान बिथरलंय.



पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईला भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलंय. पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी नवविवाहित जोडप्यांना लक्ष केलं होतं. याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं आणि ते यशस्वी करून दाखवलं.'सिंदूर'हे नाव हिंदू विवाहित स्त्रियांचे प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर योद्ध्यांसाठीही ते गौरवाचे चिन्ह आहे. सिंदूर हे योद्ध्यांचेही प्रतीक आहे. पूर्वी युद्धात जाण्यापूर्वी योद्धा कपाळावर सिंदूरचा टिळा लावत असत.


भारतीय वायुसेना आणि सैन्य दल यांनी एकत्रित ही कारवाई केली. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येतेय. इतकंच नव्हे तर पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही नष्ट करण्यात आली आहेत. एफ 16 आणि एफ 17 आकाशात नष्ट करण्यात आलीत. आकाश मिसाईलने पाकिस्तानच्या दोन्ही लढावू विमानांना लक्ष केलंय. भारताने आखलेल्या आणि यशस्वी केलेल्या ऑपरशेन सिंदूर मोहिमेचं तमामा भारतीयांनी स्वागत केलंय. भारताने पुन्हा एकदा स्ट्राईक करून जगाचं लक्ष वेधलंय आणि पाकिस्तानला इशारा दिलाय.

Comments
Add Comment

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत

INDvsAFG TEST : भारत विरुद्ध अफगाणिस्तान; एकमेव कसोटी सामना

PANJAB : मुल्लांपूर (नवी चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि

Beed Suicide : लग्नाचा १२ वा दिवस अन् नवरदेवाची आत्महत्या! बायकोच्या डायरीत दडलं होतं 'ते' भयानक सत्य

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका तलाठ्याने लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत आत्महत्या (Suicide) केल्याच्या

Mumbai News: वाकोला-बीकेसी पुलाबाबत मोठी बातमी! ९८% काम पूर्ण, मुंबईकरांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत

मुंबई:मुंबई शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (SCLR)

Nashik News : पर्यावरणदिनी नंदिनी नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, मंत्री गिरीश महाजनही झाले सहभागी

Nashik News : जागतिक पर्यावरण दिनाच्या (World Environment Day) पार्श्वभूमीवर व 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत आज नाशिक शहरातील नंदिनी