केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्र सरकारने गुरुवार ८ मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्वपक्षीय प्रतिनिधींनी 'ऑपरेशन सिंदूर'ची थोडक्यात माहिती दिली जाईल. तसेच आता निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी सांगितले जाईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत हा विषय कसा हाताळत आहे त्याची कल्पना दिली जाईल. भारतीय सैन्य दले येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले जाईल. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' का केले आणि त्यातून काय साध्य झाले याबाबतही सर्वपक्षीय प्रतिनिधींनी सांगितले जाणार आहे.



पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी हल्ला केला. अतिरेक्यांनी २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या केली होती. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' केले. यात भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे तळ नष्ट केले. या पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती सर्वपक्षीय नेत्यांनी दिली जाणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. सर्वपक्षीय बैठक गुरुवार ८ मे २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता संसद ग्रंथालय इमारतीच्या समिती कक्ष जी - ०७४ नवी दिल्ली येथे होणार आहे.


'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत बुधवारी पहाटे करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये अतिरेक्यांच्या नऊ तळांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आणि अतिरेकी कारवायांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहावलपूरमधील प्रशिक्षण शिबिरांचा समावेश आहे. अवघ्या २५ मिनिटांत सैन्याने कारवाई पूर्ण केली. ही कारवाई बुधवार ७ मे २०२५ रोजी पहाटे एक वाजून पाच मिनिटे ते एक वाजून तीस मिनिटे या कालावधीत करण्यात आली. 'ऑपरेशन सिंदूर' ही एक नियंत्रित कारवाई होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई पूर्ण होताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना सैन्याच्या कामगिरीची माहिती दिली.


अतिरेक्यांच्या पाकिस्तानमधील पायाभूत सुविधा नष्ट करणे, कमीत कमी नागरी हानी करणे आणि व्यापक संघर्ष टाळणे हाच भारताचा हेतू होता; असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले.

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या