केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्र सरकारने गुरुवार ८ मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्वपक्षीय प्रतिनिधींनी 'ऑपरेशन सिंदूर'ची थोडक्यात माहिती दिली जाईल. तसेच आता निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी सांगितले जाईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत हा विषय कसा हाताळत आहे त्याची कल्पना दिली जाईल. भारतीय सैन्य दले येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले जाईल. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' का केले आणि त्यातून काय साध्य झाले याबाबतही सर्वपक्षीय प्रतिनिधींनी सांगितले जाणार आहे.



पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी हल्ला केला. अतिरेक्यांनी २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या केली होती. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' केले. यात भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे तळ नष्ट केले. या पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती सर्वपक्षीय नेत्यांनी दिली जाणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. सर्वपक्षीय बैठक गुरुवार ८ मे २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता संसद ग्रंथालय इमारतीच्या समिती कक्ष जी - ०७४ नवी दिल्ली येथे होणार आहे.


'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत बुधवारी पहाटे करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये अतिरेक्यांच्या नऊ तळांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आणि अतिरेकी कारवायांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहावलपूरमधील प्रशिक्षण शिबिरांचा समावेश आहे. अवघ्या २५ मिनिटांत सैन्याने कारवाई पूर्ण केली. ही कारवाई बुधवार ७ मे २०२५ रोजी पहाटे एक वाजून पाच मिनिटे ते एक वाजून तीस मिनिटे या कालावधीत करण्यात आली. 'ऑपरेशन सिंदूर' ही एक नियंत्रित कारवाई होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई पूर्ण होताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना सैन्याच्या कामगिरीची माहिती दिली.


अतिरेक्यांच्या पाकिस्तानमधील पायाभूत सुविधा नष्ट करणे, कमीत कमी नागरी हानी करणे आणि व्यापक संघर्ष टाळणे हाच भारताचा हेतू होता; असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे