Operation Sindoor :२५ मिनीटात ७० दहशतवादी ठार

नवी दिल्ली : पहलगाममधील २६ हिंदूंच्या टार्गेट किलींगनंतर भारताने मंगळवारी मध्यरात्रीनंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ नष्ट केले. तसेच रात्री १.०५ ते १.३० वाजेच्या दरम्यान अवघ्या २५ मिनीटात ७० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली.

भारतीय वायुसेना, नौदल आणि लष्कराने एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. राफेल विमानांनी स्काल्प आणि हॅमर मिसाईल्सचा वापर करत पाकिस्तानात 4 ठिकाणी आणि पीओकेमध्ये 5 असा एकूण 9 ठिकाणी हल्ला केला. हे हल्ले भारतीय हद्दीतूनच करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना टार्गेट केले नाही. हा सर्जिकल स्ट्राईक योग्य वेळ, मर्यादित, अचूक आणि गैर-आक्रमक असल्याचे सांगितले. या हलल्यांचे नियोजन, गुप्तचर माहिती, सॅटेलाइट फोटो आणि संनाद यंत्रणेवर आधारित होते. भारतीय सैन्याने अवघ्या 25 मिनीटात 9 दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. यामध्ये बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय, मार्कझ सुभान अल्लाह, मुरिदके येथील लष्कर-ए-तय्यबाचा मार्कझ तैबा, सियालकोट येथील मेहमूना जिया (हिजबुल मुजाहिदीन), तेहरा कलन येथील सर्जल (जैश), कोटली येथील मार्कझ अब्बास आणि मस्कर रहील शाहिद, मुजफ्फराबाद येथील शवई नाला आणि सय्यदना बिलाल तळ, तसेच बरनाला येथील मार्कझ अहले हदीस यांचा समावेश होता.

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने पुंछ आणि राजौरी येथील सीमावर्ती भारतीय गावांवर गोळीबार केला. त्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला, तर 44 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने नीलम-झेलम प्रकल्प आणि नागरी ठिकाणांवर हल्ले झाल्याचा खोटा दावा केला. पाकिस्तानचा दावा भारताच्या पीआयबी फॅक्टचेकने खोडून काढला. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ आणि पीओकेतील रहिवाशांनी शेअर केलेल्या फुटेजमुळे पाकिस्तानच्या क्रूरतेचा पुरावा समोर आला. भारताने अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, यूएई आणि रशियाला ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती दिली. दहशतवाद्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाठिंबा मिळालाय. दोन्ही देशांनी शांतता बाळगावी, असे आवाहन यूएनकडून करण्यात आलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रभर ऑपरेशन सिंदूरचे निरीक्षण केले, तर एनएसए अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या