मोखाड्यातील नागरिकांच्या घशाला कोरड कायम

  27


  • २५० कोटींची योजना; गाव-पाड्यांत भीषण टंचाई

  • दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचे सावट

  • वारघडपाडा,घोसाळी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू

  • ७ पाणीपुरवठा योजना बंद


मोखाडा : डोंगर, दऱ्यांनी व्यापलेल्या मोखाडा तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचे सावट गडद आहे. नागरिकांना घरोघरी नळाने पाणी मिळावे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अडीचशे कोटीहून अधिक रकमेच्या योजनेतून तसेच जिल्हा परिषदेने ही पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला. मात्र या योजनांची कामे रखडल्याने तालुकावासियांच्या घशाला कोरड कायम आहे. यंदा ३० गाव-पाड्यांत भीषण टंचाई असून त्यांना टँकरने पाणीपुरवठा होतो आहे तर तेही पाणी पुरत नसल्याने महिला हंडाभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून दोन-तीन किमीचा प्रवास करताना दिसत आहेत.


मोखाड्यात ३० गाव-पाड्यांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून नगरपंचायत क्षेत्रात सुद्धा ६ गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. गभालपाडा व माळी पाडा येथील प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. मोखाडा तालुक्यातील प्रमुख योजना अप्पर वैतरणा धरणसाठ्यावरून तयार केली असून हेच पाणी अनेक गावपाड्यांजवळील एका टाकीपर्यंत पोहोचवले गेले आहे. तिथून पुन्हा गावात आणि घरात नळ देण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून छोट्या योजना बनवून कामे चालू आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग अशी दोघांची मिळून ही योजना प्रत्येकाच्या घरात पाणी पोहोचवणार होती. मात्र या कामांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी सुद्धा पाणी केवळ टाक्यांपर्यंत आणि तेथून कसेबरे विहीरीत पाणी नेले जाते.



सुरुवातीपासून योजना वादग्रस्त


पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यास तालुक्याची पाणीसमस्या यामुळे सुटणार आहे. मात्र अगदी सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली होती, कारण जीवन प्राधिकरणाकडून खोदाई करताना नियम पाळले गेले नाहीत. अर्ध्यापेक्षा जास्त पाइप रस्त्याला लागून पुरले गेले आहेत. आधी सिमेंटच्या टाक्या बांधण्यात येणार असताना मध्येच अंदाजपत्रकात बदल करून काम उरकावे म्हणून अॅल्युमिनियमच्या टाक्या बांधल्या यामुळे टाकीचे आयुष्य कमी झाले आहे.



या गावांत टंचाई


गोळीचापाडा, धामोडी, वारघडपाडा, वाशाळा, मडक्याची मेट हनुमान टेकडी, केवनाळा,पाथर्डी, हेदवाडी, गोमघर, वाघवाडी, किनिस्तेपैकी गवरचरीपाडा, जांभूळवाडी या ग्रामीण भागातील गावांप्रमाणेच मोखाडा शहरातील वारघडपाडा, घोसाळी आणि तेलीपाडा या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू असून मेपर्यंत ही टंचाई अधिक प्रमाणात वाढणार आहे.

Comments
Add Comment

सरकार क्रीडा क्षेत्राला चालना देत आहे : चंद्रशेखर बावनकुळे

शेवगाव : आपले सरकार क्रीडा धोरण पुढे घेऊन जात गावा-गावात खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला चालना

राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली, तर खरी क्रांती : शिवगिरी महाराज

संगमनेर : धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार व प्रसार करण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली तर खरी क्रांती

​Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर​ चार महिन्यांत ११ बळी!

मुंबई- पुणे या सहा पदरी महामार्गावरील आजघडीला दररोज लाखो वाहने धावतात. यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्ग म्हणून

Pune News : बकरी ईद निमित्त पुण्यातील ‘हे’ रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते वाचा

पुणे : मुस्लिम बांधवांसाठी बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. देशभरात ७ जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली

Rajgad Fort : पतीसह गेली राजगड फिरायला; पाय घसरला अन् थेट १५० फूट दरीत कोसळली

पुणे : पुण्यातील राजगडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावसाळा सुरु होताच अनेकांनी गाद किल्ले फिरायला सुरुवात केली

राज ठाकरे लागले कामाला, पक्षात मोठे फेरबदल, ९ जूनला ठाकरेंचा दौरा

पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यात