मोखाड्यातील नागरिकांच्या घशाला कोरड कायम

  49


  • २५० कोटींची योजना; गाव-पाड्यांत भीषण टंचाई

  • दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचे सावट

  • वारघडपाडा,घोसाळी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू

  • ७ पाणीपुरवठा योजना बंद


मोखाडा : डोंगर, दऱ्यांनी व्यापलेल्या मोखाडा तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचे सावट गडद आहे. नागरिकांना घरोघरी नळाने पाणी मिळावे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अडीचशे कोटीहून अधिक रकमेच्या योजनेतून तसेच जिल्हा परिषदेने ही पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला. मात्र या योजनांची कामे रखडल्याने तालुकावासियांच्या घशाला कोरड कायम आहे. यंदा ३० गाव-पाड्यांत भीषण टंचाई असून त्यांना टँकरने पाणीपुरवठा होतो आहे तर तेही पाणी पुरत नसल्याने महिला हंडाभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून दोन-तीन किमीचा प्रवास करताना दिसत आहेत.


मोखाड्यात ३० गाव-पाड्यांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून नगरपंचायत क्षेत्रात सुद्धा ६ गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. गभालपाडा व माळी पाडा येथील प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. मोखाडा तालुक्यातील प्रमुख योजना अप्पर वैतरणा धरणसाठ्यावरून तयार केली असून हेच पाणी अनेक गावपाड्यांजवळील एका टाकीपर्यंत पोहोचवले गेले आहे. तिथून पुन्हा गावात आणि घरात नळ देण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून छोट्या योजना बनवून कामे चालू आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग अशी दोघांची मिळून ही योजना प्रत्येकाच्या घरात पाणी पोहोचवणार होती. मात्र या कामांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी सुद्धा पाणी केवळ टाक्यांपर्यंत आणि तेथून कसेबरे विहीरीत पाणी नेले जाते.



सुरुवातीपासून योजना वादग्रस्त


पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यास तालुक्याची पाणीसमस्या यामुळे सुटणार आहे. मात्र अगदी सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली होती, कारण जीवन प्राधिकरणाकडून खोदाई करताना नियम पाळले गेले नाहीत. अर्ध्यापेक्षा जास्त पाइप रस्त्याला लागून पुरले गेले आहेत. आधी सिमेंटच्या टाक्या बांधण्यात येणार असताना मध्येच अंदाजपत्रकात बदल करून काम उरकावे म्हणून अॅल्युमिनियमच्या टाक्या बांधल्या यामुळे टाकीचे आयुष्य कमी झाले आहे.



या गावांत टंचाई


गोळीचापाडा, धामोडी, वारघडपाडा, वाशाळा, मडक्याची मेट हनुमान टेकडी, केवनाळा,पाथर्डी, हेदवाडी, गोमघर, वाघवाडी, किनिस्तेपैकी गवरचरीपाडा, जांभूळवाडी या ग्रामीण भागातील गावांप्रमाणेच मोखाडा शहरातील वारघडपाडा, घोसाळी आणि तेलीपाडा या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू असून मेपर्यंत ही टंचाई अधिक प्रमाणात वाढणार आहे.

Comments
Add Comment

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार