Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर शुभम द्विवेदीच्या पत्नीने दिली 'ही' प्रतिक्रिया!

"आज माझ्या पतीच्या आत्म्याला शांती मिळाली"


मुंबई: भारताने पाकिस्तानला उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर राबवत जोरदार हल्ले केले आहेत. भारताने पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केलेआहेत. सकाळी १० वाजता लष्कराची पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यात नेमकं ऑपरेशन सिंदूर कसं राबवण्यात आलं याची माहिती देण्यात येईल.
पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. त्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. याच हल्ल्यात शुभम द्विवेदीचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्यात गोळ्या झाडून त्याला ठार करण्यात आलं. शुभमचं दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. तो त्याच्या पत्नीसह आणि कुटुंबासह काश्मीरला फिरायला आला होता. मात्र २२ तारखेच्या दहशतवादी हल्ल्यात सर्वात आधी शुभमला ठार करण्यात आलं. आता ऑपरेशन सिंदूरनंतर शुभमच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे.


काय म्हणाली शुभम द्विवेदीची पत्नी


मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानते. माझ्या पतीच्या (शुभम) मृत्यूचा बदला त्यांनी घेतला आहे. मी खूप लहान आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी काय सांगणार? पण मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला आहे. मी खरोखरच त्यांची ऋणी आहे. शुभम आज जिथे कुठे असेल तिथे त्याच्या आत्म्याला आज शांती मिळाली असेल. असं म्हणत शुभम द्विवेदीच्या पत्नीने एअर स्ट्राईकबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

२२ एप्रिलच्या दुपारी काय घडलं होतं?


शुभम आणि त्याच्या पत्नीने दुपारी १ च्या सुमारास हॉटेल सोडलं. त्यानंतर ते घोडेस्वारीसाठी गेले होते. त्यांच्याबरोबरचे इतर कुटुंबीय हॉटेलमध्ये थांबले होते. शुभम आणि त्याची पत्नी फिरायला गेले असतानाच दहशतवाद्यांनी शुभमला गोळ्या झाडून ठार केलं. इश्याना असं शुभमच्या पत्नीचं नाव आहे. शुभमला तिच्या डोळ्यांदेखतच दहशतवाद्यांनी ठार केलं. शुभमचा भाऊ मनोज याने ही माहिती दिली आहे. शुभमचा चुलत भाऊ सौरभ याने ही माहिती दिली की शुभम आणि इशान्या यांचं लग्न १३ फेब्रुवारीला झालं होतं. दोघंही काश्मीरमध्ये कुटुंबीयांसह फिरायला गेले होते. त्याचवेळी ही घटना घडली. आता इश्याना द्विवेदी यांनी सरकारकडे शुभमला शहीद घोषित करावं अशी मागणी केली होती. आज इश्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

 

 
Comments
Add Comment

नेमक्या कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या ?

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या तब्बल ४० एकर जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची दमदार सुरुवात

मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. उमेदवारी अर्ज

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

नेपाळमध्ये पुन्हा पेटलं जेन झी चं आंदोलन

काठमांडू : नेपाळमध्ये पुन्हा जेन झी आंदोलन पेटलं आहे. देशातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. परिस्थिती

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध हॅट्ट्ट्रिक

मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व कायम! जामनेर : जिल्ह्यात सध्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम